केंद्राकडून आर्थिक वर्ष 2019-20 साठी वार्षिक GST भरण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत वाढ दिली गेली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली तमिळनाडूचे मुख्यंमंत्री इडापड्डी पलानीस्वामी यांची भेट घेतली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ पन्नेरसेल्वम यांची भेट घेतली आहे. ट्वीट-

 

जम्मू कश्मीर येथून जैश ए मोहम्मद संगठनेच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

तमिळनाडू येथे 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 

क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 52 वर्षीय व्यक्तिच्या विरोधात गोवंडी पोलीस स्थानकात FIR दाखल  करण्यात आला आहे.

दिल्लीत महिलेची लूट करताना तिला भोकसल्याप्रकरणी पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

मोहन डेलकर यांच्या आत्महत्याप्रकरणी दादरा आणि नगर हवेलीच्या पोलिसांनी मुंबई पोलिसांना तपासासाठी मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 8293 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 62 जणांचा बळी  गेला आहे.

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 582 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1,82,176 वर पोहचला आहे.

Load More

महाराष्ट्रात फेब्रवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात 8 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. शनिवारी राज्यात 8 हजार 623 नव्या करोनाबाधितांची वाढ झाल्याचे समोर आले. तसेच, 51 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्या ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' करतील. आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रमातून ते देशवासियांना संबोधित करणार आहेत. हा त्यांच्या रेडिओ कार्यक्रमाचा 74 वा भाग आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या महिन्याच्या सुरुवातीला लोकांना 'मन की बात'साठी वेगवेगळ्या विषयांवरील कल्पना आणि सूचना विचारल्या आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडू शकतात.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, 1 मार्चपासून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष कोणता मुद्दा उचलून धरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून शिवसेना नेते संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावेळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.