झारखंड येथे आज आणखी 151 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विट-

 

कानपूर येथे एका पत्रकाराचा मृतदेह आढळून आला आहे. आशु यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 1 जानेवारीला तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी दिली होती. ट्विट-

 

झारखंड मध्ये आज दिवसभरात 151 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,15,392 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 1034 वर पोहोचला आहे.

तिरुवनंतपुरमच्या  कोवळममधील अझीमाला शिव मंदिर 31 डिसेंबर 2020 पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. ट्विट-

 

हिमाचल प्रदेशमध्ये आज आणखी 149 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

महाराष्ट्र: गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई सीपी परमबीर सिंह यांच्या उपस्थितीत पोलिसांना वरळी येथे गस्त घालण्यासाठी उपयोग होणाऱ्या सेगवे इलेक्ट्रिक स्कूटरला हिरवा झेंडा दाखवला. अभिनेता अक्षय कुमारही या कार्यक्रमाला हजर होता.

गाझीपूरमधील उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवर केंद्राच्या नवीन कृषी कायद्याचा निषेध करत असलेल्या 75 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

मुंबईत आज कोरोना विषाणूच्या 592 नवीन रुग्णांची व 7 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज मुंबईमध्ये 695 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 2,94,659 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2,74,767 रुग्ण बरे झाले आहेत व 11,132 मृत्यू झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 7,892 सक्रीय रुग्ण आहेत.

हिमवृष्टीमुळे अटल बोगद्याचे दक्षिण पोर्टल आणि मनालीमधील सोलंग नल्ला दरम्यान 500 पर्यटक अडकले आहेत. वाहनांची रहदारी आणि अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रमण गरसंघी, एसडीएम मनाली, हिमाचल प्रदेश यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन 3,218 रुग्णांची व 51 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 2,110 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यासह एकूण प्रकरणांची संख्या 19,38,854 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 18,34,935 रुग्ण बरे झाले आहेत एकूण मृत्यू 49,631 इतके आहेत. सध्या महाराष्ट्रात एकूण 53,137 सक्रीय प्रप्रकरणे आहेत.

Load More

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू (Coronavirus) भारतातदेखील आढळून आला आहे. त्यामुळे देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, अशातचं आज देशभरात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात आज तीन ठिकाणी कोरोना लसीकरण सराव फेरी घेण्यात येणार आहे. यात शहरातील जिल्हा औंध रुग्णालय, पिंपरी-चिंचवड येथील जिजामाता रुग्णालय आणि ग्रामीण भागातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सराव फेरी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, आज शिवसेनेच्या मुखपत्र सामनातून विरोध पक्ष भाजपवर सनसणीत टीका करण्यात आली आहे. सध्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीमुळे शहराच्या नामांतराच्या मुद्द्यांने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध केल्या. त्यामुळे भाजपाने यावर शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. यावर शिवसेनेने सामनातून भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

शिवसेनेने भूमिका बदललेलीच नसून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीचं जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरचं दुरुस्ती होईल. भाजपाने त्याची काळजी करू नये. औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसही मान्य करेल. औरंगजेब हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, अशी खोचक टीकाही शिवसेनेने भाजपवर केली आहे.