झारखंड येथे आज 2 हजार 64 कोरोनाबाधित आढळले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 43 हजार 833 वर पोहचली आहे. यापैकी 428 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 28 हजार 149 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एएनआयचे ट्विट- 

  

ओडिशा राज्यातील खोरदा आणि पुरी येथे महापूर आला आहे. अग्निशम दलाच्या जवानांनी महापुरात अडकलेल्या 115 जणांना वाचविले. पुरग्रस्तांना मदत साहित्य वितरीत केले आहे. पुरात अडकलेल्या एका माकडालाही जवानांनी वाचवले., अशी माहिती ओडिशाच्या अग्निशमन दल विभाग प्रमुखांनी दिली आहे.

सिक्कीम येथे आज 18 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 670 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट-

 

मुंबईत आज आणखी 1 हजार 142 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 46 हजार 947 वर पोहचली आहे. यापैकी 7 हजार 690 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 20 हजार 65 रुग्णांवर उपचार सुरु आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

महाराष्ट्रात आज तब्बल 15 हजार 765 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 लाख 8 हजार 306 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

पुणे शहरात आज नव्याने 1695 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

 

धारावीत आज 5 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 

मणिपूरमध्ये आज 130 नवे कोरोना रुग्ण आढळून  आले आहेत. तसेच एकाचा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

ऑगस्ट महिन्यात 86,449 कोटी जीएसटी महसूलाचे संकलन

 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती विसर्जन केलं आहे.

 

Load More

आज पासुन देशभरात जेईई परिक्षेला  सुरुवात होत आहे. सर्व परिक्षा केंद्रावर सुरक्षेचे सर्व नियम पाळून या विद्यार्थ्यांना परिक्षा देता येणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात JEE आणि NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकलमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, परीक्षेचं अॅडमिट कार्ड पाहून स्टेशनमध्ये प्रवेश मिळणार, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून परिपत्रक जारी करुन देण्यात आली आहे.

दुसरीकडे देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee Death) यांंच्या निधनानंंतर आज राष्ट्रपती भवन व संंसदेवरील तिरंंगा अर्ध्यावर आणण्यात आला आहे. देशभरात सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती समजत आहे यानुसार देशातील शासकीय इमारतींंवरील झेंंडा अर्ध्यावरच आणला जाईल तसेच सात दिवस मनोरंंजनाचा कोणताही शासकीय कार्यक्रम होणार नाही असे सांंगण्यात आले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, आज अनंंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) च्या मुहुर्तावर देशभरात बाप्पा आपल्या भाविकांंचा निरोप घेणार आहेत. कोरोनाचे संंकट पाहता मोठमोठ्या गणेश मंंडळानी सुद्धा मंडपातच कृत्रिम तलाव/हौद तयार करुन विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील पाच मानाच्या गणपतींंचे व मुंंबईतील गणेशगल्ली, चिंंचपोकळीचा चिंंतामणी येथील गणेश मुर्तींंचे विसर्जन सुद्धा अशाच पद्धतीने पार पडेल.