ओशिवरा परिसरात 19 वर्षीय तरुणी नाल्यात पडली, तरुणीचे शोधकार्य सुरु, अग्निशामक दल आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुण्यामध्ये तृप्ती देसाई यांच्याविरोधात एका महिलेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनुराधा पाटील असे यांचे नाव असून, कोथरूड पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. जाणीवपूर्वक धार्मिक भावाला दुखावल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

भीम आर्मीने दाखल केलेल्या याचिकेवर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार आणि नागपूर पोलिस आयुक्तांना नोटीस बजावली असून, चंद्रशेखर आझाद यांना 22 फेब्रुवारी रोजी रेशीमबाग मैदानावर जाहीर सभा घेण्यास परवानगी न देण्याच्या पोलिस निर्णयाला आव्हान दिले आहे.

पुणे येथील पंढरीनाथ तथा अण्णासाहेब तुकाराम पठारे यांना शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवछत्रपती पुरस्कारासाठी जीवन गौरव, मार्गदर्शन, संघटक, कार्यकर्ते, खेळाडू अशा पाच गटामध्ये तब्बल 289 अर्ज प्राप्त, यातून 63 व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली गेली. क्रीडामंत्री सुनील केदार यांनी याबाबत माहिती दिली. 22 फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान समारंभासह, खेलो इंडिया युथ गेम्स 2020 मधील पदक विजेत्या खेळाडूंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. 

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात एफआयआर दाखल केला असून, यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 512. 54 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.  

महाराष्ट्रात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याला विरोधच करणार असल्याची ठाम भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे. हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे, जिथे कुठेही समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल तिथे काँग्रेस पक्ष विरोधच करेल. CAA बद्दल आम्ही मित्रपक्षांशी बोलून आणि चारचा करून मत बदलण्याचा प्रयत्न करू असेही थोरात म्हणाले आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी CAA ला पाठिंबा दर्शवल्यावरून थोरात बोलत होते.

तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना असे न केल्यास त्यांचे तोंड काळे करू असा इशारा दिला होता, यावर महाराष्ट्र करणीसेनेने पलटवार करत तृप्ती देसाईंनी जर का इंदुरीकरांचा विरोध केला तर आम्हीच त्यांचं तोंड काळं करू असे उत्तर दिले आहे. 

शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योजेनचा विस्तार करण्यासाठी  अन्न व नागरी पुरवठा विभागास सूचना दिल्याचे समजत आहे, यानुसार दिवसाला या योजनेतील थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात येणार असून आता दिवसाला 36 हजार थाळी उपलब्ध असणार आहेत.

अशरफ़ ग़नी यांची पुन्हा एकदा अफगाणिस्तान च्या राष्ट्राध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.

नाशिक येथील एमआयएम चे आमदार फारुख शहा यांच्यासहित 164 नेत्यांवर तसेच भाजपचे स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदे यांच्यावर पुढील तीन वर्ष मनपा निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या खर्चाचे तपशील न दिल्याने नाशिक महानगपालिका आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.  

Load More

महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीची परीक्षा आज (18 फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे. अनेकांच्या करियरला टर्निंग पॉईंट ठरणारी ही परीक्षा राज्यभरात 9 विविध जिल्हानिहाय शिक्षण मंडळांकडून एकाच वेळी घेतली जाणार आहे. दरम्यान यंदा बारावीची परीक्षेला सामोरे जाणार्‍यांची संख्या 15 लाख 5 हजार 27 इतकी आहे. दरम्यान यामध्ये 8,43,553 मुलं तर 6,61,325 मुलींचा समावेश असून राज्यात एकून 3036 परीक्षा केंद्रावर आजपासून परीक्षेला सुरूवात होणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारपासून कोकण दौर्‍यावर आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे रत्नागिरी मधील नाणार रिफायनरी प्रकल्पासोबतच महत्त्वाच्या विकासप्रकल्पांचा आढावा घेत आहेत. रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता. शिवसेनेही त्यांना पाठिंबा देत प्रकल्पाविरोधी भूमिका घेतली होती. मात्र, आता पुढील विकासप्रकल्पासाठी आज मुख्यमंत्री स्थानिकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी17 फेब्रुवारी सोमवार राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 24 फेब्रुवारीपासून सुरु होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, महाविकास आघाडी सरकारचा कारभार तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपा, काँग्रेस समवेत इतर पक्षांचे 51 खासदार एप्रिल महिन्यात राज्यसभेतून सेवानिवृत्त होतील. भाजपला अजूनही राज्यसभेत बहुमत नसल्याने एप्रिल मध्ये होणाऱ्या निवडणूक भाजप पक्षासाठी महत्त्वाची आहे. राज्यसभेत सध्या 245 खासदार आहेत. खासदार निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्राला 7 जागा मिळतील

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

जपानच्या सरकारने डायमंड प्रिसेंस क्रुजवर अडकेल्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संक्रामित झालेल्या नागरिकांना 2 हजार आयफोनचे वाटप केले आहे. हे जहाज कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतर जपानच्या तटावर थांबण्यात आली आहे. वाटप करण्यात आलेल्या आयफोनमध्ये प्री-इन्स्टॉल लाइन अॅप देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मॅसेजच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क साधत कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सल्ला घेऊ शकतात. नागरिक जपान मधील चिकित्सक तज्ञांसोबत बातचीत करु शकतात. रिपोर्टच्या मते, जहाजाचे चालक आणि नागरिकांना प्रत्येक केबिन मध्ये कमीत कमी एक फोनची सोय करुन देण्यात आली आहे. डायमंड प्रिंसेस क्रुजवर जवळजवळ 3700 नागरिक अडकले आहेत. यामधील 6 जण हे भारतीय नागरिक आहेत. जहाजात क्रूचे 1100 सदस्य असून त्यापैकी 132 भारतीय आहेत. क्रूझमध्ये कोरोना व्हायरसची लागण 350 लोकांना झाली आहे.