![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/File-image-of-central-government-employees-380x214.jpg)
ओणम आणि गणेश चतुर्थी सणांमुळे, केंद्राने केरळ आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकारी कर्मचार्यांचे पगार आणि निवृत्तीवेतन वेळेपूर्वी जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त मंत्रालयाने कार्यालयीन निवेदनात म्हटले आहे की केरळमधील केंद्र सरकारी कर्मचारी 25 ऑगस्ट रोजी त्यांचे ऑगस्टचे वेतन काढू शकतात. महाराष्ट्रात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरचे वेतन 27 सप्टेंबरपर्यंत काढता येणार आहे. सरकारने बँका/पीएओना राज्यांमधील सर्व केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांचे पेन्शन त्याच दिवशी वितरित करण्याचा सल्ला दिला आहे. (हे देखील वाचा: SBI To Open 300 Branches: एसबीआय सध्याच्या आर्थिक वर्षात 300 नव्या ब्रांच सुरू करणार)
अर्थ मंत्रालयाने सांगितले की, केरळ आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये सेवा देणाऱ्या केंद्र सरकारच्या औद्योगिक कर्मचाऱ्यांचे पगारही वर दिलेल्या तारखांनुसार आगाऊ वितरीत केले जातील. वित्त मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, संबंधित मंत्रालये/विभागांनी या सूचना केरळ आणि महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यालयांच्या निदर्शनास आणून द्याव्यात अशी विनंती आवश्यक कार्यवाहीसाठी करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे बोनस
महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा पगार 27 सप्टेंबरला जारी केला जाणार आहे. तर, निवृत्तीवेतनधारकांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे. जिथं त्यांना बँक किंवा पोस्टामार्फत ही रक्कम जारी केली जाईल. शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या इंडस्ट्रीयल कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा मजुरीची रक्कम याच महिन्यात जारी करण्यात येईल. सर्व बँकांनी या निर्णयाच्या धर्तीवर संबंधित व्यक्तींच्या खात्यात लवकरात लवकर ही रक्कम पोहोचवावी अशा सूचना RBI कडून देशातील बँकांना करण्यात आल्या आहेत.
केरळ सरकारने ओणम सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचार्यांना 4,000 रुपयांचा बोनसही जाहीर केला आहे. अहवालानुसार, जे कर्मचारी बोनससाठी पात्र नाहीत त्यांना 2,750 रुपये विशेष सण भत्ता मिळेल. याशिवाय, अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या सेवा निवृत्तीवेतनधारक आणि कर्मचाऱ्यांना 1,000 रुपये विशेष सण भत्ता मिळेल.
सरकारच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी बोनस मिळालेल्या कंत्राटी-योजना कामगारांसह सर्व कर्मचारी वर्गांना यावर्षी समान दर बोनस मिळेल. पीटीआयनुसार, केरळचे अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी सांगितले की, या उपक्रमाचा ओणमच्या निमित्ताने 13 लाख सरकारी कर्मचारी आणि मजुरांना फायदा होईल.