Heatwave Advisory By Government: तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कामगारांसाठी जारी केली मार्गदर्शक तत्त्वे, वाचा सविस्तर
अति उष्ण हवामानाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी व्यावसायिक/नियोक्ते/बांधकाम कंपन्या/उद्योगांना निर्देश जारी करण्याच्या महत्त्वावर जोर देऊन, केंद्राने मंगळवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना/प्रशासकांना उद्देशून एक पत्र जारी केले आहे.
Heatwave Advisory By Government: सध्या देशभरात उष्णतेची लाट (Heat Wave) तीव्र होताना दिसत आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सर्व राज्ये आणि प्रदेशांना विविध क्षेत्रातील कामगार आणि मजुरांवरांसाठी खास मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सरकारने राज्यांना उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाची तयारी आणि प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. अति उष्ण हवामानाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी व्यावसायिक/नियोक्ते/बांधकाम कंपन्या/उद्योगांना निर्देश जारी करण्याच्या महत्त्वावर जोर देऊन, केंद्राने मंगळवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना/प्रशासकांना उद्देशून एक पत्र जारी केले आहे. (हेही वाचा - Heat Wave in India: उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याचा इशारा; देशातील 'या' 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान)
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात खालील मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश -
- कर्मचारी/कामगारांसाठी कामाच्या तासांचे पुनर्नियोजन.
- कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय सुनिश्चित करणे.
- बांधकाम कामगारांना आपत्कालीन बर्फ पॅक आणि उष्णता आजार प्रतिबंधक साहित्याची तरतूद करणे.
- कामगारांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधणे.
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) नियोक्ते आणि कामगारांसाठी जारी केलेल्या आरोग्य सल्लागारांचे पालन करणे.
खाण व्यवस्थापनासाठी विशेष सूचना -
खाण व्यवस्थापनाला सूचना जारी करण्याच्या महत्त्वावरही या पत्रात भर देण्यात आला आहे. सरकारने खाण व्यवस्थापकांना त्वरित पावले उचलण्याची विनंती केली आहे.
कामाच्या ठिकाणाजवळ विश्रांतीची जागा, पुरेशा प्रमाणात थंड पाणी आणि इलेक्ट्रोलाइट पूरक आहार द्या.
- कामगारांना आजारी वाटत असल्यास त्यांना मंद गतीने काम करू द्या.
- भूमिगत खाणींमध्ये योग्य वायुवीजन सुनिश्चित करा.
- कामगारांना जास्त उष्णता आणि आर्द्रतेच्या धोक्यांची जाणीव करून द्या.
- कारखाने आणि खाणींव्यतिरिक्त, केंद्राने बांधकाम कामगार आणि वीटभट्टी कामगारांवर विशेष लक्ष देण्यास तसेच लेबर चौकांमध्ये पुरेशी माहिती प्रसारित करण्यास सांगितलं आहे.
IMD कडून उष्णतेच्या लाटेचा इशारा -
भारतातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. त्यामुळे हवामान अधिकाऱ्यांनी येत्या काही दिवसांसाठी इशारे जारी केले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पश्चिम बंगाल, बिहार आणि आंध्र प्रदेश या तीन भारतीय राज्यांमध्ये उच्च तापमानाच्या दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
IMD ने लोकांना उष्णतेच्या लाटांच्या संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, जसे की हायड्रेटेड राहणे, पीक अवर्समध्ये थेट सूर्यप्रकाश टाळणे आणि सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घालणे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 07:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

