मंगळवार, सप्टेंबर 08, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Xiaomi Skynomad N70 Photos: एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाही | Pune MHADA Lottery Income Proof: 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्द | महाराष्ट्र शेतमाल तारण कर्ज योजना: गोदामात माल ठेवून शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के कर्ज, 6 टक्के व्याजदर |

बीड येथील घटनेवरून निलेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; 15 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

राष्ट्रीय अण्णासाहेब चवरे | Nov 15, 2020 11:55 PM IST
A+
A-
15 Nov, 23:54 (IST)

बीडमध्ये एका 22 वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, असे निलेश राणे म्हणाले आहेत. ट्वीट-

 

15 Nov, 23:35 (IST)

बीड जिल्ह्यात नेकनूर भागात 13 नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीने एका महिलेवर अॅसिड फेकून, पेट्रोलचा वापर करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आता या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात द्रुतगती न्यायालयात खटला चालवावा, जेणेकरून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख वैयक्तिकरित्या लक्ष घालत आहेत.

 

 

15 Nov, 23:13 (IST)

आसाममध्ये आज कोरोना विषाणूच्या 93 रुग्णांची नोंद झाली असून आज 389 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 2,10,268 झाली असून, यामध्ये  2,05,636 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि यामध्ये 963 मृत्यूंचा समावेश आहे. सध्या राज्यात सक्रिय प्रकरणे 3666 आहेत.

15 Nov, 22:50 (IST)

झारखंड येथे आज आणखी 129 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

15 Nov, 22:15 (IST)

पुडुचेरीचे उपराज्यपाल चंद्रवती यांच्या आज चरखी दादरी जिल्ह्यातील डळवास येथील त्यांच्या गावी संपूर्ण राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार केले गेले. त्यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी रोहतकच्या पीजीआयएमएस रुग्णालयात निधन झाले. ट्विट-

 

15 Nov, 21:41 (IST)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी शिमला येथे  सहलीला गेले होते, असा आरोप राजद नेते शिवानंद तिवारी यांनी केला आहे. ट्विट

 

15 Nov, 20:53 (IST)

सहारनपूर, शामली, मुझफ्फरनगर, बागपत, आग्रा, अलिगड, हाथरस, एटा, कासगंज, संभाल, बदायूं, बरेली, फिरोजाबाद, इटावा, मैनपुरी,  कन्नौज, फर्रुखाबाद, लखीमपुर खेरी, औरैया जिल्हा येथे पुढील 3 तासांपर्यंत (रात्री 11:40 वाजेपर्यंत) मुसळधार पाऊस/वादळ होण्याची शक्यता आहे. IMD ने याबाबत माहिती दिली.

15 Nov, 19:51 (IST)

अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील Helmand आणि Kandahar प्रांतांमध्ये सुरक्षा दलांशी नुकत्याच झालेल्या चकमकींमध्ये 60 हून अधिक तालिबानी कमांडर्सचा मृत्यू झाला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

15 Nov, 19:23 (IST)

दिल्लीत RT-PCR चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाचे मोबाइल चाचणी व्हॅन असुरक्षित ठिकाणी तैनात करण्यात येतील. कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी काही एमव्हीडी रुग्णालये कोविड समर्पित रुग्णालयात रूपांतरित केली जातील. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली.

15 Nov, 18:32 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 2,544 रुग्णांची आणि 60 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 3,065 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 84,918 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत 16,15,379 रुग्ण बरे झाले असून, 45,974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Load More

राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे उद्यापासून (सोमवार, 26 नोव्हेंबर) उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे राज्यभरातील 'भक्त' मंडळींच्या आनंदाला उधान आले आहे. मात्र, मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी नियम आणि अटींचे पालन काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता भक्तांना घ्यावी लागणार आहे. मंदिरात जाताना कोणत्याही स्थितीमध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्या नियमांचे पालन करायचे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवाहन केले आहे. या अवाहनात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, प्रार्थनास्थळांतील गर्दी टाळा. गाभाऱ्यात, प्रार्थनास्थलात जाताना गर्दी टाळा. शिस्तपालन आवश्यक, मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या काळात विवाहांवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंगल कार्यालयं बंद आहेत. अशा वेळी नागरिक रिसार्टला मोठ्या प्रमाणावर पसंती देताना दिसत आहेत. काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत रिसॉर्टवर विवाह सोहळा आयोजित करणयाचा ट्रेण्ड वाढताना दिसतो आहे. त्यामुळे रिसॉर्ट व्यावसायिकांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मंगल कार्यालय व्यावसायिकांचे उत्पादन मात्र बरेचसे घटत असल्याचे पाहायाल मिळत आहे.

कोरोना काळात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अवघे जग ठप्प झाले. अशा वेळी घरी थांबून करायचे काय असा सवाल अनेकांच्या पुढे निर्माण झाला होता. अशा स्थितीत अनेकांनी ऑनलाईन वेबसीरिज, चित्रपट, मालिका पाहण्यााला प्राधान्य दिले. तर काहींनी वाचनाद्वारे आपला व्यासंघ वाढविण्याचा प्रयत्न केला. व्यासंघ वाढविणाऱ्यांचा टक्का लॉकडाऊन काळात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा ग्रंथविक्री आणि ग्रंथखरेदी यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यात दिवाळी अंकांचाही समावेश आहे. दिवाळी आणि लॉकडाऊन काळात ग्रंथविक्री मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे प्रकाशक आवर्जून सांगतात.

दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

SocialLY


Show Full Article Share Now
Close
Latestly whatsapp channel