बीडमध्ये एका 22 वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, असे निलेश राणे म्हणाले आहेत. ट्वीट-
बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 15, 2020
बीड जिल्ह्यात नेकनूर भागात 13 नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीने एका महिलेवर अॅसिड फेकून, पेट्रोलचा वापर करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आता या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात द्रुतगती न्यायालयात खटला चालवावा, जेणेकरून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख वैयक्तिकरित्या लक्ष घालत आहेत.
"The accused has been arrested. Directions have been given that the matter be tried in a fast-track court so that the guilty be given strictest of punishment. I am personally looking into the matter," tweets Maharashtra Home Minister Anil Deshmukh. (File photo) https://t.co/7ylCzD3iQX pic.twitter.com/eUG622UnaF— ANI (@ANI) November 15, 2020
आसाममध्ये आज कोरोना विषाणूच्या 93 रुग्णांची नोंद झाली असून आज 389 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 2,10,268 झाली असून, यामध्ये 2,05,636 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि यामध्ये 963 मृत्यूंचा समावेश आहे. सध्या राज्यात सक्रिय प्रकरणे 3666 आहेत.
Assam reports 93 new #COVID19 cases and 389 new discharges today.
Total cases in the state rise to 2,10,268, including 2,05,636 discharges and 963 deaths.
Active cases stand at 3666 pic.twitter.com/SN3HN1XivV— ANI (@ANI) November 15, 2020
झारखंड येथे आज आणखी 129 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-
झारखंड में आज 129 नए #COVID19 मामले, 291 रिकवरी / डिस्चार्ज और 2 मौतें दर्ज़ की गई।
राज्य में कुल मामले 1,06,648 हो गए हैं, जिसमें 1,02,188 रिकवरी / डिस्चार्ज और 924 मौतें शामिल हैं। सक्रिय मामले 2952 हैं। pic.twitter.com/r8APxywhkf— ANI_HindiNews (@AHindinews) November 15, 2020
पुडुचेरीचे उपराज्यपाल चंद्रवती यांच्या आज चरखी दादरी जिल्ह्यातील डळवास येथील त्यांच्या गावी संपूर्ण राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार केले गेले. त्यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी रोहतकच्या पीजीआयएमएस रुग्णालयात निधन झाले. ट्विट-
Haryana: Former Puducherry Lt Governor Chandrawati was cremated at her native village Dalawas in Charkhi Dadri dist earlier today with full state honour. Her last rites were performed as per COVID guidelines.
She passed away at the age of 92, at Rohtak’s PGIMS hospital today. pic.twitter.com/UWxkkDOR5w— ANI (@ANI) November 15, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी शिमला येथे सहलीला गेले होते, असा आरोप राजद नेते शिवानंद तिवारी यांनी केला आहे. ट्विट
#WATCH: RJD leader Shivanand Tiwari speaks on #BiharResults, says "...elections were in full swing & Rahul Gandhi was on picnic at Priyanka ji's place in Shimla. Is party run like that? Allegations can be levelled that manner in which Congress is being run, it's benefitting BJP." pic.twitter.com/ZZXmndMJFh— ANI (@ANI) November 15, 2020
सहारनपूर, शामली, मुझफ्फरनगर, बागपत, आग्रा, अलिगड, हाथरस, एटा, कासगंज, संभाल, बदायूं, बरेली, फिरोजाबाद, इटावा, मैनपुरी, कन्नौज, फर्रुखाबाद, लखीमपुर खेरी, औरैया जिल्हा येथे पुढील 3 तासांपर्यंत (रात्री 11:40 वाजेपर्यंत) मुसळधार पाऊस/वादळ होण्याची शक्यता आहे. IMD ने याबाबत माहिती दिली.
Rain/thundershower, lightning very likely during next 3 hrs(valid up to 11:40 pm)over Saharanpur, Shamli, Muzaffarnagar, Baghpat, Agra, Aligarh, Hathras, Etah, Kasganj, Sambhal, Badaun, Bareilly, Firozabad, Etawah, Mainpuri, Kannauj, Farrukhabad, Lakhimpur Kheri, Auraiya dist:IMD— ANI UP (@ANINewsUP) November 15, 2020
अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील Helmand आणि Kandahar प्रांतांमध्ये सुरक्षा दलांशी नुकत्याच झालेल्या चकमकींमध्ये 60 हून अधिक तालिबानी कमांडर्सचा मृत्यू झाला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
More than 60 key Taliban commanders have been killed in recent clashes with security forces in Afghanistan's southern Helmand and Kandahar provinces, says Ministry of Interior:
Pajhwok Afghan News— ANI (@ANI) November 15, 2020
दिल्लीत RT-PCR चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाचे मोबाइल चाचणी व्हॅन असुरक्षित ठिकाणी तैनात करण्यात येतील. कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी काही एमव्हीडी रुग्णालये कोविड समर्पित रुग्णालयात रूपांतरित केली जातील. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली.
The number of RT-PCR tests to be doubled in #Delhi. Mobile Testing Vans of ICMR and Health Ministry to be deployed at vulnerable spots. Few MCD hospitals to be converted into COVID dedicated hospitals for treatment of COVID patients with mild symptoms: Home Minister Amit Shah pic.twitter.com/zO5zpktmZe— ANI (@ANI) November 15, 2020
महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 2,544 रुग्णांची आणि 60 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 3,065 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 84,918 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत 16,15,379 रुग्ण बरे झाले असून, 45,974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra reports 2,544 new #COVID19 cases, 3,065 recoveries & 60 deaths today.
There are 84,918 active cases in the State and 16,15,379 patients have recovered so far.
The death toll is at 45,974 pic.twitter.com/yiSBLmqRtJ— ANI (@ANI) November 15, 2020
राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे उद्यापासून (सोमवार, 26 नोव्हेंबर) उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे राज्यभरातील 'भक्त' मंडळींच्या आनंदाला उधान आले आहे. मात्र, मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी नियम आणि अटींचे पालन काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता भक्तांना घ्यावी लागणार आहे. मंदिरात जाताना कोणत्याही स्थितीमध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्या नियमांचे पालन करायचे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवाहन केले आहे. या अवाहनात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, प्रार्थनास्थळांतील गर्दी टाळा. गाभाऱ्यात, प्रार्थनास्थलात जाताना गर्दी टाळा. शिस्तपालन आवश्यक, मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या काळात विवाहांवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंगल कार्यालयं बंद आहेत. अशा वेळी नागरिक रिसार्टला मोठ्या प्रमाणावर पसंती देताना दिसत आहेत. काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत रिसॉर्टवर विवाह सोहळा आयोजित करणयाचा ट्रेण्ड वाढताना दिसतो आहे. त्यामुळे रिसॉर्ट व्यावसायिकांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मंगल कार्यालय व्यावसायिकांचे उत्पादन मात्र बरेचसे घटत असल्याचे पाहायाल मिळत आहे.
कोरोना काळात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अवघे जग ठप्प झाले. अशा वेळी घरी थांबून करायचे काय असा सवाल अनेकांच्या पुढे निर्माण झाला होता. अशा स्थितीत अनेकांनी ऑनलाईन वेबसीरिज, चित्रपट, मालिका पाहण्यााला प्राधान्य दिले. तर काहींनी वाचनाद्वारे आपला व्यासंघ वाढविण्याचा प्रयत्न केला. व्यासंघ वाढविणाऱ्यांचा टक्का लॉकडाऊन काळात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा ग्रंथविक्री आणि ग्रंथखरेदी यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यात दिवाळी अंकांचाही समावेश आहे. दिवाळी आणि लॉकडाऊन काळात ग्रंथविक्री मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे प्रकाशक आवर्जून सांगतात.
दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.