Rohit Sharma-Virat Kohli Alleged Rift: रोहित-विराट यांच्यामधील काढीत दुराव्यावर अखेर रवी शास्त्री यांनी सोडले मौन, पाहा काय म्हणाले
2019/20 मध्ये काही प्रसंगी त्यांच्यात कथित मतभेदाच्या बातम्या चर्चा बनल्या होत्या. मात्र, या बातमीला कधीच पुष्टी मिळाली नाही. यादरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत कोहली आणि रोहित यांच्यातील वादाच्या वृत्तांवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की दोन खेळाडूंमध्ये खूप चांगले संबंध आहेत आणि कोणताही वाद नाही.
Rohit Sharma-Virat Kohli Alleged Rift: भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात कथित मतभेद होते का? 2019/20 मध्ये काही प्रसंगी त्यांच्यात कथित मतभेदाच्या बातम्या चर्चा बनल्या होत्या. मात्र, या बातमीला कधीच पुष्टी मिळाली नाही आणि कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) चांगली कामगिरी करत राहिली. तो सर्व फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे, तर रोहित शर्मा वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये टीमचा उपकर्णधार आहे व त्याने अनेकदा कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली आहे. यादरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय कर्णधार कोहली आणि सलामीवीर रोहित यांच्यातील वादाच्या वृत्तांवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की दोन खेळाडूंमध्ये खूप चांगले संबंध आहेत आणि कोणताही वाद नाही. (ICC Test Rankings: ओव्हल कसोटीपूर्वी रोहित शर्माचा कर्णधार विराट कोहलीला धक्का, Joe Root नंबर 1 स्थानावर विराजमान)
शास्त्री यांनी गुरुवारी सांगितले की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात खूप चांगले संबंध आहेत. ते म्हणाले की जर काही समस्या असेल तर त्यांनी स्वतः त्यावर चर्चा केली असती आणि दुरावा दूर केला असता.” टाइम्स नाऊशी संभाषणात ते म्हणाले, “मी ते कधीच पाहिले नाही. म्हणून जेव्हा लोक मला असे विचारत असत, तेव्हा तुम्ही जे पाहिले ते मी पाहिले नाही असे मी म्हणतो. समन्वय नेहमीच असतो. त्याचा कधीच संघावर परिणाम होताना मी पाहिलं नाही. जर मला संघात प्रभाव दिसला तर मी विराट किंवा रोहितच्या चेहऱ्यावर असे म्हणेन की हे योग्य नाही आणि तुम्हाला गोष्टी वेगळ्या दृष्टीने पाहाव्या लागतील. पण मी पहिल्या दिवसापासून संघावर परिणाम करताना पाहिले नाही. मी एक व्यक्ती आहे जो मला जे पाहिजे ते सांगतो.” दरम्यान, 2019 मध्ये कोहलीला देखील कथित मतभेदाबद्दल देखील विचारले गेले आणि त्याने असे दावे स्पष्ट नाकारले होते.
शास्त्री पुढे म्हणाले की, “मीसुद्धा या विषयावर यापूर्वी बरेच ऐकले होते. ड्रेसिंग रूमचे वातावरण यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर दोघांमध्ये फूट पडल्याची अफवा खरी ठरली असती तर आम्ही चांगली कामगिरी केली नसती. अशा बातम्या वाचणे हास्यास्पद आहे. अशा बातम्या समोर आणणे हे निंदनीय आहे. आपण टीम इंडियाच्या ड्रेसिंग फॉर्ममध्ये आलात तरच आपण कसे आहोत हे आपण पाहू शकाल. आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही आणि ते तुम्हाला संघ सदस्य आणि कर्णधार म्हणून आश्चर्यचकित करते.” सध्या, कोहली आणि रोहित दोघेही टीम इंडियासह ब्रिटन दौऱ्यावर आहेत आणि इंग्लंडचा सामना करण्यासाठी सप्टेंबर 2 (गुरुवार) पासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानात चौथ्या कसोटीत सज्ज आहेत. पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2021 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

