'IPL 2020 साठी टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलले', ‘मँकेगेट’चा संदर्भ देत 'या' पाकिस्तानी खेळाडूने BCCI, क्रिकेट ऑस्ट्रेलियावर केला आरोप
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो आणि त्याने पुन्हा तेच केले. यूट्यूब कार्यक्रमात जिओ क्रिकेटशी बोलताना अख्तरने टी -20 वर्ल्ड कप पुढे ढकलल्याबद्दल बीसीसीआयकडे बोट दाखवले आणि आपला मुद्दा मांडण्यासाठी ‘मंकीगेट’ वादाचा संदर्भ दिला.
पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो आणि त्याने पुन्हा तेच केले. यूट्यूब कार्यक्रमात जिओ क्रिकेटशी बोलताना अख्तरने टी -20 वर्ल्ड कप (T20 World Cup) पुढे ढकलल्याबद्दल बीसीसीआयकडे बोट दाखवले आणि आपला मुद्दा मांडण्यासाठी ‘मंकीगेट’ (Monkeygate) वादाचा संदर्भ दिला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सच्या वादात हरभजन सिंहला ‘वाचण्यात’ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) प्रभाव असल्याचे अख्तर यांनी सूचित केले. अख्तरने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर (Cricket Australia) ‘बॉल टेंपरिंग’ घोटाळा आणि ‘मंकीगेट’ प्रकरणावरून निशाणा साधला. “कधीकधी त्यांना मेलबर्नमध्ये सहज विकेट्स मिळवतात, कधीकधी कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीला माकड म्हणून संबोधते परंतु ते वाचतात, आणि चर्चा मालिकेवर बहिष्कारापर्यंत पोहोचते. मी ऑस्ट्रेलियांना विचारत आहे, त्यांचे नीतिशास्त्र कोठे आहे?” अख्तर म्हणाले. (IPL 2020 Update: BCCI ने UAE मध्ये आयपीएल आयोजनासाठी दिली नवीन तारीख, वेळेतही होणार बदल, जाणून घ्या पूर्ण माहिती!)
अख्तरने त्या घटनेचा उल्लेख केला होता ज्यात हरभजनवर सिडनी येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू सायमंड्सविरुद्ध वांशिक टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. “तुम्ही मुलांना क्रिकेट बॉल ओरखडण्यासाठी रडवले आणि एखाद्याला 'माकड' म्हणून बोलावल्यावर तेथून निघून जाऊ दिले. त्यांनी [बीसीसीआय] मालिका संपविण्याचे सांगितले आणि ते [ऑस्ट्रेलियन बोर्ड] म्हणाले की अशी कोणतीही घटना घडली नाही. हे तुमचे नैतिक आधार आहेत काय, तुम्हाला माइकवर आवाज आला नाही,” अख्तर म्हणाला.
दुसरीकडे, कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकबाबत बोलताना अख्तर म्हणाला की या स्पर्धा वेळापत्रकानुसार होऊ शकल्या असत्या. “एशिया कप नक्कीच होऊ शकलं असतं भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरूद्ध खेळण्याची मोठी संधी मिळाली असती. यामागे बरीच कारणे आहेत. टी-20 विश्वचषक देखील होऊ शकला असता, परंतु मी हे आधीच सांगितले होते की ते होऊ देणार नाहीत. आयपीएलचे नुकसान होऊ नये, विश्वचषक खड्ड्यात जाऊ द्या,” अख्तर म्हणाला.
(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2020 09:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

