T20 World Cup 2021 मध्ये टीम इंडियाच्या गेम प्लानवर प्रशिक्षक रवि शास्त्रींनीं केला खुलासा, पहा काय म्हणाले
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

क्रिकेट इतिहासातील आपला दुसरा टी-20 वर्ल्ड कप जेतेपद जिंकण्याच्या दिशेने टीम इंडियाने (Team India) सकारात्मक सुरुवात केली आहे. इंग्लंड (England) विरुद्ध दुबई येथे झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताने सात विकेटने दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने (Indian Team) 189 धावांचे विषय लक्ष्य एक षटक शिल्लक असताना गाठले. या सामन्यादरम्यान, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी आग्रह धरला की त्यांच्याकडे नाणेफेक किंवा संघ निवडीबाबत कोणतीही विशिष्ट रणनीती नाही. भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामन्याने टी-20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. याबाबत शास्त्री म्हणाले की, जो काही निर्णय होईल तो खेळपट्टीच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल. शास्त्री यांनी विश्वास मत दर्शवत म्हणाले की जे खेळाडू यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या मोसमात सहभागी झाले आहेत त्यांना जास्त तयारीची गरज नाही आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी वातावरणाची सवय लावण्याची गरज आहे. प्रशिक्षक म्हणाले की सराव सामने भारताला पुन्हा गती मिळण्यास मदत करतील. (T20 World Cup 2021: इंग्लंडविरुद्ध वार्म-अप सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली पण ‘या’ कमजोर कडी देखील आल्या समोर, सुधार न केल्यास होणार मोठं नुकसान)

सराव सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्सवर बोलताना शास्त्री म्हणाले, “टीम गेल्या 2 महिन्यांपासून आयपीएल खेळत आहेत, त्यामुळे त्यांना जास्त तयारीची गरज आहे असे मला वाटत नाही. त्यांच्या एकत्र येण्याबद्दल आणि जुळवून घेण्याबद्दल हे अधिक आहे. काही लय चालू ठेवा, थोडी उर्जा मिळवा. प्रत्येकजण फलंदाजी करू शकतो, प्रत्येकजण गोलंदाजी करू शकतो (या सामन्यात), त्यामुळे कोण कसे करत आहे याची कल्पना मिळण्यास आम्हाला मदत होईल.” शास्त्रींनी स्पष्ट केले की सराव सामन्या दरम्यान मुख्य उद्देश खेळाडूंची लय तपासणे आहे. त्यांनी पुढे म्हटले की, “गोष्टी कशा चालतात आणि एकत्रितपणे कसे कार्य करतात ते आम्ही पाहू. आम्ही फक्त किती दव आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानुसार प्रथम फलंदाजी/गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ. अतिरिक्त स्पिनर किंवा सीमर खेळण्याबाबत आम्हाला निर्णय घेण्यास मदत होते.”

उल्लेखनीय आहे की भारतीय संघाचे सर्व सामने संध्याकाळी असणार आहे जेव्हा दव एक प्रमुख घटक असेल. जास्त दव, म्हणजे फिरकीपटूंना चेंडू पकडणे अधिक अवघड जाईल, ज्यामुळे फलंदाजांसाठी स्ट्रोक-प्ले सोपे होईल.