'बाप बाप होता है, बेटा बेटा'! वीरेंद्र सहवागबरोबरच्या किस्याबद्दल शोएब अख्तर याने केला खुलासा, म्हणाला-भारतीय फलंदाज लबाड
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि 'रावलपिंडी एक्स्प्रेस' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तर याने एक अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. मुलतान टेस्ट सामन्यात सहवाग आणि अख्तरमध्ये बराच वाद झाला होता. शोएबने आता लाईव्ह सांगितले आहे की, त्याच्या आणि सहवाग दरम्यान काहीही घडले नव्हते आणि नंतर सहवागने जे काही सांगितले ते अगदी खोटे आहे.
पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज आणि 'रावलपिंडी एक्स्प्रेस' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने एक अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. रविवारी शोएब 'हॅलो' ऍपवर लाइव्ह चॅट दरम्यान आपल्या चाहत्यांशी बर्याच विषयांवर चर्चा केली. 16 वर्षांपूर्वी वीरेंद्र सहवाग (Virender Sehwag) याने मुलतान टेस्ट (Multan Test) सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 309 धावांची खेळी करत इतिहास रचला होता. सामन्यादरम्यान सहवाग आणि अख्तरमध्ये बराच वाद झाला होता. शोएबने आता लाईव्ह सांगितले आहे की, त्याच्या आणि सहवाग दरम्यान काहीही घडले नव्हते आणि नंतर सहवागने जे काही सांगितले ते अगदी खोटे आहे. मार्च-एप्रिल 2004 मधील या कसोटी सामन्यात सहवागने असा दावा केला होता की या खेळी दरम्यान शोएबने डावा दरम्यान वारंवार शॉर्ट बॉल टाकले होते. अख्तरनेही सेहवागला हुक शॉट खेळायला सांगितले होते पण सहवागने दिग्गज सचिन तेंडुलकरकडे इशारा केला. सहवागने सांगितले होते की सचिनला अख्तरने चेंडू टाकताच त्याने चौकार ठोकला आणि त्यानंतर सेहवाग म्हणाला, "बाप-बाप होता है, बेटा-बेटा."
आता 16 वर्षांनंतर अख्तर म्हणाला की सहवागचा खोटं बोलला. हलो ऍपपवरील लाईव्ह व्हिडिओ सत्रादरम्यान अख्तर म्हणाला की, मुल्तान कसोटीत असे काही घडलेले नाही. तो म्हणाला, "सहवागच्या या गोष्टी खोट्या आहेत. मी सहवागला हुक मारायला कधीच म्हटले नाही. 2011 मध्ये मी सेहवाग आणि गंभीर यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. गंभीरलाही याची जाणीव आहे." अख्तर म्हणाला, “अशा प्रकारे माझ्याशी बोलल्यावर मी कोणालाही सोडले असते आपणास असे वाटते?” सेहवाग असे विधान करत असलेला व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.
आणि आता शोएब काय म्हणाला ते येथे पाहा:
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 मार्च 2004 पासून सुरू झालेल्या या कसोटी सामन्यात सेहवागने 309 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताने पहिला डाव 5 विकेट्स गमावून 675 धावांवर घोषित केला, त्यानंतर पाकिस्तान पहिल्या डावात 407 धावा आणि दुसऱ्या डावात 216 धावांवर ऑलआऊट झाला. भारताने डाव आणि 52 धावांनी सामना जिंकला.
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2020 09:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

