Rohit Sharma Injury Update: रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी का नाही झाली निवड? कोच रवि शास्त्री यांनी वैद्यकीय अहवालाबाबत माहिती देत सांगितले कारण
रोहित शर्मा (Photo Credit: IANS)

Rohit Sharma Injury Update: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी रोहित शर्माच्या दुखापतीच्या (Rohit Sharma Injury) वैद्यकीय अहवालाबद्दल माहिती दिली आहे. रोहित शर्माची (Rohit Sharma) दुखापत फारच खोल आहे आणि जर तो खेळला तर तो पुन्हा दुखापतीच्या धोक्यात येऊ शकतो असे शास्त्री यांनी म्हटले. शास्त्री यांनी म्हटले की 'हिटमॅन' रोहितने परतण्याची घाई करू नये. रोहित सध्या आयपीएलच्या (IPL) वेळी झालेल्या हॅमस्ट्रिंग इझीशी झगडत आहे आणि त्यातून तो सावरत आहे. आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहितची टीम इंडियाच्या सर्व फॉरमॅट संघात आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour of Australia) निवड झाली नाही. तथापि, ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा होताच रोहित मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) नेटमध्ये सराव करताना दिसला. त्याचबरोबर आता रवि शास्त्री यांनी रोहितच्या फिटनेसबाबतची परिस्थितीही साफ केली. रोहितचा वैद्यकीय अहवाल पाहता ऑस्ट्रेलियन दौर्‍यासाठी निवड समितीने त्याला भारतीय संघात (Indian Cricket Team) स्थान दिले नाही, असेही शास्त्री यांनी उघड केले. (Rohit Sharma Injury Update: प्ले-ऑफमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या संघाचे नेतृत्व करणार? पाहा काय म्हणाला किरोन पोलार्ड)

"हे वैद्यकीय भागाचे प्रभारी लोक हाताळत आहेत. आम्ही त्यात सामील होत नाही. त्यांनी निवड समितीला अहवाल सादर केला आहे आणि ते त्यानुसार पुढे गेले. माझे काहीही म्हणणे नाही, मी निवड समितीचा भाग नाही. वैद्यकीय अहवालात असे म्हटले आहे की त्याला पुन्हा त्याला इजा होण्याचा धोका असू शकतो, असे शास्त्री यांनी 'टाइम्स नाऊ'ला सांगितले. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होणार आहे. यादरम्यान, दोन्ही संघात 3 टी-20 आणि वनडे मालिका, व त्यानंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.

शास्त्री यांनी त्यांच्या खेळण्याच्या दिवसांत केलेली चूक करू नये असाही रोहितला सल्ला दिला. दरम्यान, बीसीसीआय रोहितच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे आणि आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची शक्यता आहे. "मला भीती वाटते की, ते मी स्वतः एक क्रिकेटर म्हणून करीत होतो. 1991 मध्ये जेव्हा मी नसावे तेव्हा ऑस्ट्रेलियाला गेलो तेव्हा मी माझे करिअर पूर्ण केले होते. जर मी 3-4 महिने ब्रेक घेतला असता तर मला भारतासाठी पाच वर्षे जास्त खेळणेशक्य झाले असते. म्हणून मी अनुभवातून बोलतो. हे एक समान प्रकरण आहे. मला जायचे होते. डॉक्टरांनी मला जाऊ नका असे सांगितले. तो लोभ होता. मी प्रचंड फॉर्ममध्ये होतो म्हणून परत जाण्याची उत्सुकता होती. मला आशा आहे की रोहितचे प्रकरण गंभीर नसावे आणि ईशांतचे (शर्मा) देखील," शास्त्री म्हणाले.