IPL 2021, MI vs DC: पराभवामुळे निराश झालेल्या रोहित शर्माला अजूनही कमबॅकची आस, पाहा काय म्हणाला मुंबई इंडियन्स कर्णधार
श्रेयस अय्यरच्या नाबाद 33 धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या आयपीएल 2021 च्या 46 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चार गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा पराभवामुळे निराश दिसला आणि म्हणाला की, आशा आहे की पुढील दोन सामन्यांमध्ये आम्ही ज्या पद्धतीच्या खेळासाठी ओळखले जातो तास खेळू.
श्रेयस अय्यरच्या नाबाद 33 धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या आयपीएल 2021 च्या 46 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) चार गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 8 बाद 129 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाने अय्यरच्या दोन चौकारांच्या मदतीने 33 चेंडूत 33 धावांवर 19.1 षटकांत सहा गडी गमावून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पराभवामुळे निराश दिसला आणि म्हणाला की, आशा आहे की पुढील दोन सामन्यांमध्ये आम्ही ज्या पद्धतीच्या खेळासाठी ओळखले जातो तास खेळू. मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना सर्वात महत्वाचा होता. कारण आजच्या विजय मिळवून त्यांनी प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले असते. आजच्या सामन्यात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे फलंदाज अपयशी ठरले. (IPL 2021, MI vs DC: दिल्ली कॅपिटल्सचा 4 विकेटने खणखणीत विजय, गतविजेता मुंबई इंडियन्सवर प्लेऑफ मधून बाहेर होण्याचे संकट!)
रोहित म्हणाला, “आम्हाला माहित होते की हे एक कठीण मैदान असेल. आम्ही बरेच सामने पाहिले आणि खेळणे व खूप धावा करण्यासाठी हे सर्वात सोपे ठिकाण नाही. आम्ही चांगली तयारी केली होती आणि आम्हाला माहित होते की आम्हाला काय करायचे आहे. मला वाटले की आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आम्हाला माहित होते की ही 170-180 विकेट नाही, पण माहित होते की ती 140 विकेट आहे. आम्हाला भागीदारी मिळत नाही. जर तुमचे फलंदाज बोर्डवर धावा काढत नसतील तर गेम जिंकणे कठीण आहे. मी वैयक्तिकरित्या ते स्वीकारतो. आम्ही मैदानात काम करू शकलो नाही, जे विशेषतः निराशाजनक आहे. आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळत नाही. आशा आहे की पुढील दोन सामन्यांमध्ये आम्ही ज्या खेळासाठी ओळखले जातो तास खेळ करू.”
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत सामन्यानंतर म्हणाला, “शारजामध्ये विकेट नेहमी वेगळ्या पद्धतीने खेळते. हा एक कठीण विजय आहे. आम्ही मुख्यत्वे पॉवरप्लेमध्ये वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. मी अश्विनपैकी एकाला उचलले. त्याला पोलार्ड आणि हार्दिकपासून दूर ठेवण्यासाठी. आवेश हा आमच्यासाठी हंगामाचा शोध आहे, पण दिल्ली कॅपिटल्समध्ये आपण आपल्या चुकांमधून शिकतो आणि सुधारतो. आम्हाला आपली फलंदाजी मजबूत करावी लागेल. काही दिवसांसाठी स्टोइनिस बारा होईल, आणि तो आमच्यासाठी चांगले असेल. तुम्ही नेहमी त्यासाठी जाऊ शकत नाही, परंतु कोणीतरी पॉवरप्लेमध्ये आक्रमक असणे आवश्यक आहे.”
(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2021 08:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

