IPL 2020: पाच पराभवानंतर सलग 5 विजय; पराभवांची मालिका मोडत KXIPची गाडी कशी आली विजयपथावर? संघातील 'या' बदलांनी झाला फायदा

इंडियन प्रीमिअर लीगच्या अर्ध्या मार्गावर ते गुणतालिकेच्या तळाशी बसलेले होते, पण किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि सध्या पहिल्या चार संघात स्थान मिळविले आहे. पण अचानक पंजाबने पुनरागमन केलं कसं, किंग्स इलेव्हनने संघात नेमके काय बदल केलेत ज्याचा फायदा त्यांना झाला याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

IPL 2020: पाच पराभवानंतर सलग 5 विजय; पराभवांची मालिका मोडत KXIPची गाडी कशी आली विजयपथावर? संघातील 'या' बदलांनी झाला फायदा
किंग्ज इलेव्हन पंजाब (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) अर्ध्या मार्गावर ते गुणतालिकेच्या तळाशी बसलेले होते, पण किंग्ज इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) आयपीएलमध्ये (IPL) जोरदार पुनरागमन केले आणि सध्या पहिल्या चार संघात स्थान मिळविले आहे. चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले. आयपीएल प्ले ऑफ (IPL PlayOffs) शर्यत रंगतदार होण्यामागचं एक कारण म्हणजे किंग्स इलेव्हन पंजाब आहे.त्यांनी सलग पाच सामने गमावल्यावर मागील पाच सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याविरुद्ध सामने शिल्लक असताना 2014 नंतर पहिल्यांदा केएल राहुलच्या नेतृत्वात किंग्स इलेव्हन पंजाब प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या वाटेवर आहे. पण अचानक पंजाबने पुनरागमन केलं कसं, किंग्स इलेव्हनने संघात नेमके काय बदल केलेत ज्याचा फायदा त्यांना झाला याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. (KXIP vs RR, IPL 2020: राजस्थान रॉयल्सचा टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय, पाहा Playing XI)

1. विजयाचे पराभवात रूपांतर

लीगच्या पहिल्या हाल्फमध्ये किंग्स इलेव्हनने जिंकलेले सामने गमावले. दिल्ली राजधानीच्या विरूद्ध सुरुवातीच्या सामन्यात तीन चेंडूंत एक धाव करू शकले नाहीत, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 223 धावांचा बचाव करता आला नाही, कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध नऊ विकेट शिल्लक असताना 17 चेंडूत 21 धावाही त्यांना करता आल्या नाही. हे दर्शविते की ते खराब क्रिकेट खेळत नव्हते, परंतु सामना संपविण्यास सक्षम नव्हते. पण, नंतर त्यांनी त्यांच्या चुका सुधरवल्या आणि गोष्टी आपणून त्यांच्या बाजून फिरल्या. पंजाबने पराभवाच्या तोंडून विजय खेचून आणला.

2. क्रिस गेलचे आगमन

पराभवाच्या दिशेने झेप घेणाऱ्या पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 'युनिव्हर्स बॉस' गेलच्या समावेशाने संघाला त्याच्या अनुभवाचा फायदा झाला. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने कर्णधार के एल राहुलवरचा बराच दबाव कमी केला. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या गेलचं दडपण हे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवरही असतंच. कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचे हे त्याला चांगलेच माहित आहे. दिल्लीविरुद्ध धावांचा पाठलाग करताना गेलने तुषार देशपांडेच्या एका ओव्हरमध्ये 26 धावा ठोकल्या.

3. निकोलस पूरनचा फॉर्म

पूरनला त्याच्या निवडीच्या शॉटने यंदा भरपूर निराश केले. पूरन पंजाबच्या मधल्या फळीतला सर्वात प्रमुख खेळाडू आहे, पण त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याचे नुकसान पंजाबला झाले. परंतु वेळ निघून जाण्यापूर्वी पूरनने धडा शिकला आणि दिल्लीच्या कॅपिटल्सविरुद्ध बुद्धिमानीने शॉट्स निवडले. पूरनच्या शॉट्सची श्रेणी आणि मोठ्या फटकेबाजीने पंजाबच्या फलंदाजी लाइन अपमध्ये आणखी एक परिणामकारक अध्याय जोडला.

4.युवा खेळाडूंनी निभावली जबाबदारी

मोहम्मद शमी संपूर्ण हंगामात केएक्सआयपीसाठी एक उत्तम कामगिरी करत होता, परंतु त्याला फारसा पाठिंबा मिळत नव्हता. गोलंदाजीच्या सुरुवातीला बॉल शेल्डन कॉटरेल काही वेळा प्रभावी होता, परंतु डेथ ओव्हरच्या वेळी तो अपयशी ठरला. पण 20 वर्षीय अर्शदीप सिंहने टीममध्ये येताच आपली जबाबदारी ओळखत आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावी केलं. मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे असल्याने त्यांनी फिरकीपटू मुरुगन अश्विन आणि रवी बिश्नोईवर विश्वास ठेवला व त्यांनीही निराश केले नाही.

याशिवाय, ग्लेन मॅक्सवेल बॅटने प्रभावी कामगिरी करत नसला तरी टीममध्ये त्याच्या गोलंदाजीचा पुरेपूर वापर करून घेतला जात आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संपुन 4 ओव्हर टाकले आणि 31 धावा देत दोन विकेटही घेतल्या ज्यात रिषभ पंतचाही समावेश होता. मागील काही सामान्यांपासून पंजाबने शानदार खेळ केला आहे, अशा स्थितीत जर त्यांनी प्ले ऑफचं तिकीट मिळवलं तर यात नवल वाटायला नको.

(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2020 08:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).