IND vs WI Series 2022: ‘कॅप्टन’ रोहित शर्माच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी अजित आगरकरचे मोठे वक्तव्य, कर्णधार समोरील आव्हाने मोजून दाखवली

IND vs WI Series 2022: वेस्ट इंडिजविरुद्ध भारताच्या आगामी मालिकेपूर्वी माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर म्हणाले की कर्णधार रोहित शर्मासाठी प्रत्येक सामन्यासाठी तंदुरुस्त राहणे हे सर्वात मोठे आव्हान असेल. हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत खेळू शकला नाही, परंतु तो आता बरा झाला आहे आणि विंडीजविरुद्ध आगामी व्हाईट-बॉल मालिकेत तो संघाचे नेतृत्व करेल.

IND vs WI Series 2022: ‘कॅप्टन’ रोहित शर्माच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी अजित आगरकरचे मोठे वक्तव्य, कर्णधार समोरील आव्हाने मोजून दाखवली
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs WI Series 2022: भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) मर्यदित षटकांच्या मालिकेपूर्वी माजी गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar) म्हणाला की कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) समोर तंदुरुस्त राहणे हे सर्वात मोठे आव्हान असेल. टीम इंडिया (Team India( 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे आणि त्यानंतर 16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर T20I मालिका खेळणार आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाची (Indian Team) घोषणा करताना टी-20 संघाचा कर्णधार म्हणून पायउतार झालेल्या विराट कोहलीकडून वनडे संघाची कमान देखील काढून घेण्यात आली आणि रोहितला नवीन एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले. रोहितने यापूर्वी एकदिवसीय सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे, पण पूर्ण-वेळ कर्णधार म्हणून रोहितचीही पहिलीच मालिका असणार आहे. (India 1st ODI Playing XI vs West Indies: कोरोना प्रभावित टीम इंडियाचे कसे असेल कॉम्बिनेशन, ‘या’ अष्टपैलूला मिळणार पदार्पणाची संधी; पहा संभावित 11)

आणि आता भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मासाठी तंदुरुस्त राहणे आणि पुढील 24 महिन्यांत होणाऱ्या टी-20 आणि वनडे विश्वचषकपूर्वी प्रत्येक स्पर्धा खेळणे हे सर्वात मोठे आव्हान असेल. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत खेळू शकला नाही, परंतु तो आता बरा झाला आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आगामी व्हाईट-बॉल मालिकेत तो संघाचे नेतृत्व करेल. “मला वाटते की व्हाईट-बॉलसाठी एक कर्णधार असणे ही चांगली आणि योग्य गोष्ट आहे आणि आता रोहित खरोखरच उडू शकतो,” आगरकर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला. “त्यामुळे माझ्या मते रोहित शर्मासाठी आव्हान आहे - तंदुरुस्त राहणे आणि आतापासून ते पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये विश्वचषकापर्यंत जे काही आहे ते खेळणे, कारण तुम्हाला विराट कोहलीच्या बलस्थानांपैकी एक असलेला कर्णधार हवा आहे किंवा त्याआधी एमएस धोनी. की, ते क्वचितच खेळ चुकले आणि दोघेही खूप तंदुरुस्त होते,” आगरकर म्हणाला.

डाव्या हाताच्या दुखापतीमुळे रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेला मुकला होता. त्यानंतर निवड समितीने संघ जाहीर करण्यापूर्वी त्याला पूर्ण तंदुरुस्ती मिळू न शकल्याने त्याला वनडे मालिकेतूनही बाहेर बसावे लागले होते. हॅमस्ट्रिंग ही एक वारंवार समस्या आहे ज्यामुळे त्याला पहिले दोन कसोटी सामने तसेच 2020-21 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील व्हाईट-बॉल मालिकेला मुकावे लागले होते. मात्र, रोहित आता वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी पुन्हा संघाची कमान हाती घेण्यास सज्ज आहे. भारत 6 फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे, त्यानंतर 16 फेब्रुवारीपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर टी-20 मालिका खेळली जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2022 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).