IND vs SL 2nd ODI: राहुल द्रविडच्या त्या मास्टर स्ट्रोकमुळे झाला भारताचा विजय, भुवनेश्वर कुमारचा मोठा खुलासा
राहुल द्रविड (Photo Credit: Getty)

IND vs SL 2nd ODI: कोलंबोच्या (Colombo) आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात दीपक चाहरला (Deepak Chahar) त्याच्याऐवजी पुढच्या क्रमांकावर बढती देण्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा निर्णय असल्याचे भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने खुलासा केला आहे. द्रविडचा निर्णय मास्टर-स्ट्रोक ठरला आणि दीपकने 82 चेंडूत 69 धावा काढल्या टीम इंडियाला (Team India) सामन्यात तीन विकेट्सने विजय मिळवून दिला. मंगळवारी झालेल्या विजयासह भारताने (India) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही 2-0 अशी आघाडी मिळवून घेतली आहे. चाहर आणि भुवनेश्वरने आठव्या विकेटसाठी तिसरी सर्वाधिक 84 धावांची भागीदारी केली आणि 49.1 ओव्हरमध्ये यशस्वीरीत्या संघाला विजयीरेष ओलांडून दिली. (IND vs SL 2nd ODI: भुवनेश्वर कुमार याचा मोठा विक्रम तुटला, श्रीलंकेविरुद्ध एका चुकीने बिघडवले गणित)

19 धावा करून नाबाद परतलेला भुवनेश्वर म्हणाला की द्रविडला चाहरची फलंदाजीची क्षमता माहित होतं आणि म्हणूनच त्याने त्याला बढती देण्याचा निर्णय घेतला. "पाहा, तो प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वात आधी भारत अ किंवा काही मालिकांमध्ये खेळला होता आणि त्याने तेथेही धावा केल्या. तर, द्रविडला माहित होतं की तो फलंदाजी करू शकतो आणि तो काही बॉल मारू शकतो, म्हणूनच त्यानी हा निर्णय घेतला,” भुवनेश्वरने सामना-उत्तरोत्तर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले. "आणि त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली, चाहरने ते सिद्ध केले. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की तो फलंदाजी करू शकतो, त्याने रणजी ट्रॉफीमध्ये अनेकदा फलंदाजी केली आहे, त्यामुळे तो कठोर निर्णय नव्हता पण त्याने धावा कशा केल्या हे पाहणे चांगले आहे. आमचे उद्दीष्ट शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या षटकात खेळणे होते, म्हणून आम्हाला ते शक्य तितके खोलवर घ्यायचे होते, जेणेकरून आम्ही धावा करू शकू. शेवटपर्यंत खेळण्याची एकच योजना होती आणि दीपकने ज्या प्रकारे फलंदाजी केली ती आश्चर्यकारक होती," भुवीने पुढे म्हटले.

276 धावांचा पाठलाग करताना भारताची स्थिती एकावेळी 193/7 अशी झाली होती आणि संघाला विजयासाठी 84 धावांची गरज होती. यानंतर चाहर व भुवनेश्वरने एकत्र येत सामन्यात विजयी भागीदारी केली. पण चाहरने दमदार फलंदाजी करून श्रीलंकेविरुद्ध नववी वनडे मालिकेत टीम इंडियाच्या खिशात घातली.