IND vs ENG Series 2021: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियातील कामगिरी पाहून इंग्लंड हादरला, माजी स्पीनर Graeme Swann यांनी दिला महत्त्वाचा सल्ला
ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यानंतर भारताचा संघ 'जवळजवळ अजेय' दिसत आहे आणि पुढच्या महिन्यात इंग्लंड संघाने विराट कोहलीच्या संघाला पराभूत केले तर अॅशेसबद्दलच्या त्यांच्या उत्कटते पेक्षाही ती मोठी कामगिरी होईल असा इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅम स्वानचा विश्वास आहे.
IND vs ENG Series 2021: ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) झालेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यानंतर भारताचा संघ (Indian Team) 'जवळजवळ अजेय' दिसत आहे आणि पुढच्या महिन्यात इंग्लंड (England) संघाने विराट कोहलीच्या संघाला पराभूत केले तर अॅशेसबद्दलच्या त्यांच्या उत्कटते पेक्षाही ती मोठी कामगिरी होईल असा इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅम स्वानचा (Graeme Swann) विश्वास आहे. इंग्लंड 5 फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौर्यावर येईल, त्यानंतर पाच टी-20 आणि तीन वनडे मालिका होणार आहेत. पहिल्या सामन्यानंतर कर्णधार कोहली उपलब्ध नसतानाही भारताने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले जे फारच कमी संघ करू शकतात, असे स्वान म्हणाले. स्वानने 'The Sun' ला सांगितले की, 'इंग्लंड नेहमीच म्हणतो की अॅशेस मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलिया हा आता जगातील सर्वोत्कृष्ट संघ नाही. कधी ते आधी असायचे... आता तसे नाही परंतु आम्हाला याबद्दल उत्कटता आहे." (IND vs ENG Series 2021: विराट कोहलीला सर्वाधिक वेळा नडला इंग्लंडचा हा गोलंदाज, किंग कोहलीला पुन्हा एकदा तंबूचा रस्ता दाखवण्यासाठी मैदानावर उतरणार)
"आम्हाला अॅशेस मालिकेतून पुढे जावे लागेल. मला वाटते की भारताला भारताला हरवणे ही यापेक्षा मोठी उप्लाब्दी असेल. 2012 मध्ये त्यांच्यावरील आमचा विजय झाल्यापासून ते अक्षरशः भारतात अजिंक्य आहेत." स्वान म्हणाला की इंग्लंडला जगातील सर्वोत्तम संघ बनायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये पराभूत करण्याच्या प्रयत्नातून त्यांना पुढे जावे लागेल. अॅशेस मालिका यावर्षी डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाणार आहे. स्वानने इंग्लंडच्या खेळाडूंना भूतकाळातील चुकांमधून धडा घ्यायला आणि केविन पीटरसनसारखा फिरकीचा सामना करण्यास सांगितले, ज्यामुळे इंग्लंडला 2012 मध्ये भारतात कसोटी मालिका जिंकण्यास मदत झाली होती. 41वर्षीय स्वानने 2008 ते 2013 दरम्यानच्या 60 कसोटी सामन्यांत आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीने 255 विकेट घेतल्या आहेत.
ते म्हणाले, 'स्पिन खेळणार्या चांगल्या खेळाडूंसमोर या संघाचा सामना करण्याची ही संधी असल्याचे लोक का म्हणत नाहीत? पायांचा वापर करा, आम्ही ज्याप्रकारे फिरकीचा वापर करतो ते पूर्णपणे बदला आणि त्यानंतर आपण भारताला हरवू शकतो." माजी कर्णधार पीटरसनने इंग्लंडची फिरकीविरुद्ध खेळण्याची पद्धत बदलल्याचे स्वान म्हणाले. स्वान म्हणाला, "स्पिनर्सने विकेट घेतल्याशिवाय आम्ही भारताला पराभूत करू शकत नाही आणि त्यानंतर केविन पीटरसनप्रमाणे फलंदाजी करावी लागेल."
(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2021 05:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

