ICC WTC Final 2021: विराट कोहलीने का नाही केले प्लेइंग XI मध्ये बदल? टीम इंडिया कॅप्टनने सांगितले मोठे कारण
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. भारत आपली प्लेइंग इलेव्हन बदलेल असा अंदाज वर्तवला जात होता तथापि, संघ व्यवस्थापनाने दोन फिरकी गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधार विराट कोहलीने हा निर्णय का घेण्यात आला हे स्पष्ट केले.
ICC WTC Final 2021: साऊथॅम्प्टन (Southampton) येथे झालेल्या पावसामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याचा पहिल्या दिवस धुवून निघाल्यावर अखेर शनिवारी सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) नाणेफेक जिंकून एजस बाउल स्टेडियमवर पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. किवी संघ पाच वेगवान गोलंदाजांसमवेत खेळत आहे, तर रविवारी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोन फिरकीपटूंचा समावेश असलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताने (Team India) कोणताही बदल केला नाही. नाणेफेकपूर्वी वादळी हवामानामुळे भारत आपली प्लेइंग इलेव्हन बदलेल असा अंदाज वर्तवला जात होता तथापि, संघ व्यवस्थापनाने दोन फिरकी गोलंदाजांसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) हा निर्णय का घेण्यात आला हे स्पष्ट केले. (ICC WTC Final 2021: टॉससाठी मैदानात पाऊल ठेवताच Virat Kohli ने आपल्या नावावर केला हा खास कीर्तिमान, मोडला MS Dhoni याचा मोठा रेकॉर्ड)
कोहलीच्या म्हणण्यानुसार टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन संपूर्ण संतुलित असून हवामानाच्या कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहे. कोहली म्हणाला की, आमच्या संघाची ताकद फलंदाजी आहे आणि धावा करणे यासारख्या मोठ्या अंतिम सामन्यात एक फायदा आहे. “आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. परंतु बोर्डवरील धावा आमची शक्ती ठरली आहेत. मोठ्या अंतिम सामन्यात, बोर्डवर धावा, तथापि बरेचसे एक फायद्याचे असते. जसे आपण आमच्या बाजूचे मेकअप पाहिले, आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयारी असतो. आम्ही कसोटी क्रिकेटमध्ये खरोखरच चांगली कामगिरी करत आहोत. आमच्यासाठी ही फक्त एक कसोटी सामना आहे ज्यात आम्हाला व्यावसायिक असणे आवश्यक आहे, आपल्या प्रक्रियेचे अनुसरण करावे लागेल,” कोहलीने नाणेफेक दरम्यान सांगितले. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला की, खेळपट्टी जशी आहे तशीच राहील अशी अपेक्षा आहे आणि पाच वेगवान गोलंदाज खेळण्याचा फायदा मिळेल अशी अपेक्षा देखील त्याने व्यक्त केली.
दुसरीकडे, आजच्या सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरताच विराटने आपला माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आणि टीम इंडियाचे सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार बनला. कोहलीचा कर्णधार म्हणून हा 61वा सामना आहे तर धोनीने 60 कसोटी सामन्यात भारताच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2021 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

