ICC WTC Final 2021: भारताविरुद्ध फायनलपूर्वी इंग्लंड विरोधात टेस्ट सिरीज खेळणे न्यूझीलंडला पडणार भारी, माजी भारतीय दिग्गजने सांगितले हे प्रमुख कारण
विराट कोहली आणि केन विल्यमसन (Photo Credit: Instagram/blackcapsnz)

ICC WTC Final 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) उद्घाटन फायनल सामन्याला आत अवघे काही दिवस शिल्लक असताना क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहत्यांनी आपला आवडता संघ निवडायची सुरुवात केली आहे. 18 जूनपासून एजस बाउल (Ageas Bowl) येथे WTC अंतिम सामन्यात 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्याची पुनरावृत्ती होईल जिथे पावसाने अडथळा आणलेल्या सामन्यात किवी संघात 18 धावांनी विजय मिळवला होता. इंग्लंडविरुद्ध (England) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे, तर भारतीय संघ जूनच्या पहिल्या आठवड्यात पोहोचेल. किवी संघाला इंग्लिश परिस्थितीची सवय करून घेण्याची संधी आहे, पण भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी नाण्याची 'दुसरी बाजू' उघड केली. (World Test Championship: कपिल देव यांनी WTC फायनल सामन्यापूर्वी Rishabh Pant ला दिला कानमंत्र, इंग्लंडमध्ये ‘ही’ चूक न करण्याचा दिला सल्ला)

इंग्लंडविरुद्ध पराभव किंवा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यापूर्वी दुखापत झाल्यास केन विल्यमसनच्या नेतृत्वातील संघाचे मनोबल कमी होईल असे त्यांना वाटते. “निराशावादी लोक असे सुचवित आहेत की WTC फायनल सामन्यापूर्वी दोन कसोटी सामने खेळणे किवीसाठी एक मोठे गुणधर्म ठरेल कारण ते सामना खेळण्यासाठी सज्ज असतील आणि परिस्थितीशी अनुकूल असतील. त्या दोन कसोटी मालिका खेळण्याची दुसरी बाजू म्हणजे न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागू शकतो आणि त्यामुळे जेव्हा ते भारताचा सामना घेतील तेव्हा त्यांचे मनोबल कमी होईल आणि इंग्लंडमध्ये जूनच्या सुरुवातीला होणार्‍या काही महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत व कर्कश भावना असू शकतात,” माजी भारतीय कर्णधाराने द टेलिग्राफच्या आपल्या लेखात लक्ष वेधले. शिवाय, महिनाभराच्या अंतरानंतर मैदानावर नव्याने उतरणाऱ्या टीम इंडियासाठी गावस्कर यांनी पाठिंबा दर्शवला.

टीम इंडियाबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले की, “टीम इंडियाच्या बाजूने काम करणारे इतर पैलू म्हणजे ते नवीन कामगिरी करण्यास उत्सुक आणि उत्साही असतील व एका महिन्याच्या अंतरानंतर त्यांचा आवडता खेळ खेळण्याची उर्जा आणि उत्सुकता त्यांच्यासाठी कोणत्याही सामन्याच्या सरावापेक्षा अधिक काम करेल.” भारतीय संघ सध्या मुंबईत क्वारंटाईन असून 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल आणि पुन्हा 10 दिवस क्वारंटाईन होईल. तथापि तीन दिवसांच्या कडक क्वारंटाईननंतर संघाला सराव करण्यास परवानगी दिली जाईल.