ICC T20 World Cup 2021: पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूने पकडली Rishabh Pant याची दुखरी नस, केली अशी टिप्पणी
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) सोबत 2021 च्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या हंगामानंतर, यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) विराट कोहलीच्या भारतीय संघाच्या (Indian Team) वर्ल्ड क्लास प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर माजी विश्वविजेता भारत आयसीसी वर्ल्ड टी-20 (ICC World T20) सलामीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan) भिडेल. पंत आपल्या तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. आणि याशिवाय तो विचित्र फटके मारण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताला आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. यापूर्वी पाकिस्तानचे माजी कर्णधार सलमान बट (Salman Butt) यांनी पंतच्या फलंदाजीविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. बटने पंतचे वर्णन मूडी फलंदाज म्हणून केले आहे. (T20 World Cup 2021, IND vs ENG warm-up: इंग्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषक सराव सामन्यात टीम इंडिया करू शकते 3 मोठे फेरबदल)

बटला जेव्हा विचारण्यात आले की पंत टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो का? ते म्हणाले, “तो खूप मूडी आहे. कुठेही नसताना तो मैदानात उतरतो आणि मारण्याचा प्रयत्न करतो. आणि, तो हे इतक्या वारंवार करतो की इतर संघांनी त्याच्या हालचालींची अपेक्षा करणे सुरू केले आहे. मला वाटते की रिषभ पंत थोडा अपेक्षित आहे,” बट म्हणाला. त्याच्या स्फोटक फलंदाजी शैलीसाठी ओळखले जाणारे, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक 10 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये होता. 58 च्या सर्वोच्च धावसंख्येसह, भारतीय विकेटकीर-फलंदाजाने 16 आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी 419 धावा केल्या. त्याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने लीग क्रमवारीत पहिला क्रमांक गाठला असला तरी डीसी अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यात अपयशी ठरली.

“त्याला अधिक परिपक्व मानसिकतेने फलंदाजी करावी लागेल. तो खूप हुशार आहे आणि त्याच्याकडे इतक्या उच्च श्रेणीचे स्ट्रोक आहेत. पण संघांना याची जाणीव आहे की तो पहिल्या चेंडूपासून किंवा 2-3 चेंडूंनंतर मोठे शॉट्स खेळणे सुरु करेल. त्यामुळे त्याला गरज आहे त्यावर काम करायची,” बटने पुढे म्हटले. उल्लेखनीय आहे की आयसीसी टी-20 विश्वचषक पंत पहिल्यादाच टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यापूर्वी तो 2019 मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. त्यावेळी तो काही खास करू शकला नाही पण यंदा त्याचा फॉर्म पाहता संघाला त्याच्याकदेउं मोठ्या आशा आहेत.