ENG vs WI 2020: क्रिकेट इज बॅक! रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेसह दिग्गजांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्वागत, भारतीय फलंदाजांनाही पुनरागमनाची प्रतीक्षा (See Tweets)

इंग्लंड-वेस्ट इंडीजमध्ये बुधवारी सुरू असलेल्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि स्वतःही क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची आशा व्यक्त केली.

ENG vs WI 2020: क्रिकेट इज बॅक! रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेसह दिग्गजांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्वागत, भारतीय फलंदाजांनाही पुनरागमनाची प्रतीक्षा (See Tweets)
रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) 117 दिवसांच्या ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे साऊथॅम्प्टनमध्ये पुनरागमन झाले. इंग्लंड (England)-वेस्ट इंडीजमध्ये (West Indies) बुधवारी सुरू असलेल्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. पण, पहिल्याच दिवशी पावसाने केलेल्या अवकृपेमुळे इंग्लंड-वेस्ट इंडिजमधील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस वाया गेला. जो रुटच्या अनुपस्थितीत इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा पर्याय निवडला आणि जगभरातील क्रिकेट विश्वाचा आनंद गगनात मावेनासा झाला. भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि स्वतःही क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची आशा व्यक्त केली. (Black Lives Matter: इंग्लंड-वेस्ट इंडिज खेळाडू आणि अंपायरांनी मैदानात गुडघ्यावर बसून हात उंच करत वर्णद्वेषाला दर्शवला विरोध, See Video)

क्रिकेटच्या मैदानावर लवकर परतल्याबद्दल भारतीय खेळाडू अनिश्चित असले तरी रोहित आणि रहाणे म्हणाले की ते मैदानावर येण्याची वाट पाहत आहे. "यूके मधून सकारात्मक सिन समोर येत आहेत. अखेरीस, क्रिकेट खेळले जात आहे हे पाहून चांगले वाटले. दोन्ही संघांना शुभेच्छा. मी स्वत: तिथे बाहेर पडण्याची प्रतीक्षा करू शकत नाही," रोहित म्हणाला.

रहाणेने ट्विट केले आणि म्हटले, "क्रिकेटचे पुनरागमन पाहून असा आनंद झाला. दोन्ही संघांचे अभिनंदन. मलाही लवकरच मैदानात परत यायचे आहे."

टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन म्हणाला,“येथून जे काही घडेल, क्रिकेटच विजेते ठरेल” वरील विधान पूर्वी बर्‍याच वेळा वापरले गेले आहे, आज एक दिवस आहे जिथे तो अगदी योग्य प्रकारे फिट होईल. दोन्ही संघांना शुभेच्छा.

रिकी पॉन्टिंग

ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न आणि रिकी पॉन्टिंग यांनीही आनंद व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर लाखो चाहत्यांप्रमाणेच या खेळाच्या पुनरागमनाचे स्वागत केले. जेव्हा खेळ आर्थिक समस्येला सामोरे जात असताना इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने व्यवसायात परतण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. लॉकडाऊन व सीमा बंद केल्यावर क्रीडा जग अनिश्चिततेने भरून गेले होते. जीव व उदरनिर्वाह हरवले आणि जुलैच्या सुरुवातीस क्रिकेट परत येईल असे वाटत नव्हते, पण इंग्लंड आणि वेस्ट इंडीज बोर्डाने कसोटी मालिकेची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने आतापर्यंत योग्य आयोजन केले आहेत आणि खेळाडू व इतर भागधारकांचे संरक्षणाची प्राथमिकता राखली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2020 09:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).