AUS-W vs IND-W D/N Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक पिंक-बॉल कसोटीतून हरमनप्रीत कौर आऊट, भारत महिला संघाला मोठा धक्का

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवार, 30 सप्टेंबरपासून एकमेव गुलाबी बॉल कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय महिला संघ पहिल्यांदाच दिवस/रात्र कसोटी सामना खेळणार आहे आणि त्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार आणि कसोटी उपकर्णधार हरमनप्रीत कौर या ऐतिहासिक कसोटी सामन्याचा भाग बनू शकणार नाही.

AUS-W vs IND-W D/N Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक पिंक-बॉल कसोटीतून हरमनप्रीत कौर आऊट, भारत महिला संघाला मोठा धक्का
हरमनप्रीत कौर (Photo Credit: Instagram)

IND-W vs AUS-W D/N Test 2021: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात गुरुवार, 30 सप्टेंबरपासून एकमेव गुलाबी बॉल कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय महिला संघ (India Women's Cricket Team) पहिल्यांदाच दिवस/रात्र कसोटी सामना खेळणार आहे आणि त्यापूर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार आणि कसोटी उपकर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या ऐतिहासिक कसोटी सामन्याचा भाग बनू शकणार नाही. स्वतः कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) याची पुष्टी केली आहे. हरमनप्रीत कौरच्या अद्यतनाबद्दल विचारले असता मिताली म्हणाली: “तिला कसोटी सामन्यासाठी वगळण्यात आले आहे.” ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका न खेळणारी हरमनप्रीत अंगठ्याच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरली आहे. हरमनप्रीतच्या जागी पूनम राऊत किंवा युवा यास्तिका भाटिया, जिने वनडे मालिका गाजवली, तिला संघात सामील केले जाऊ शकते. (AUS-W vs IND-W D/N Test 2021: पिंक-बॉल टेस्टमध्ये ‘ही’ आक्रमक फलंदाज दाखवणार आपला जलवा, माजी दिग्गज अष्टपैलू म्हणाली -‘तिची भूमिका खूप महत्वाची’)

दरम्यान, तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी हरमनप्रीत कौर करी होऊन मैदानात परतण्याची अपेक्षा केली जात आहे. इतकंच नाही तर या मालिकेनंतर ती महिला बिग बॅश लीग (WBBL) देखील खेळणे अपेक्षित आहे. हरमनप्रीत कौरने यंदाच्या हंगामासाठी मेलबर्न रेनेगेड्ससोबत करार केला आहे. तिच्या व्यतिरिक्त, अनेक भारतीय महिला क्रिकेटपटू देखील या स्पर्धेत खेळताना दिसतील, पण ती पूर्णपणे बारी व्हावी अशी सध्या चाहत्यांची अपेक्षा असेल. 15 वर्षांनंतर पहिल्यांदा दोन्ही संघ कसोटी सामन्यात आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी मिताली राज म्हणाली, “त्यांच्याकडे भारतीय संघासाठी सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी हल्ल्यांपैकी एक असावी. अर्थातच झूलन (गोस्वामी) कडे असलेला प्रचंड अनुभव आणि ती भारतीय संघासाठी कशी कामगिरी करत आहे आणि युवा वेगवान गोलंदाजांसारखे त्यांच्या पहिल्या मालिकेसाठी आलेली मेघना सिंह देखील खूप प्रभावी आहेत.”

दुसरीकडे, मितालीने पहिले सत्र चांगले हाताळण्यावर भर दिला. “मला वाटते की गुलाबी चेंडूचे पहिले सत्र काल होते. होय, प्रत्येकाला एक वेगळा अनुभव होता कारण आम्हाला गुलाबी चेंडूची सवय नाही, तो थोडासा फिरतो. मला वाटते की गुलाबी चेंडूने पाडलेली ही पहिली छाप आहे,” मिताली व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाली.

(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2021 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).