IND vs BAN Head to Head: आशिया चषकात भारत - बांगलादेश आमनेसामने, कोण आहे कोणावर वरचढ जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड
पहिल्या सुपर-4 सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. तर बांगलादेशचा संघ सुपर-4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचे सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्धच्या गटातील एकमेव सामना जिंकला.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात शुक्रवारी (15 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारताचा सामना बांगलादेशशी (IND vs BAN) होणार आहे. भारतीय संघ आपल्या सुपर-4 च्या पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव करून आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि बांगलादेश संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पहिल्या सुपर-4 सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. तर बांगलादेशचा संघ सुपर-4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचे सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्धच्या गटातील एकमेव सामना जिंकला.
कसा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 39 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 31 सामने जिंकले आहेत तर बांगलादेश संघाने फक्त 7 सामने जिंकले आहेत, 1 सामन्याचा निकाल लागला नाही. म्हणजेच एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची बांगलादेशवर 31-7 अशी आघाडी आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS ODI Series 2023: ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची होऊ शकते घोषणा, 'या' दिग्गजांना मिळू शकते संधी)
आशिया कपमध्ये हेड टू हेड रेकाॅर्ड
आशिया कपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण 14 सामने झाले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 13 सामने जिंकले आहेत तर बांगलादेशने फक्त एकच सामना जिंकला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यातील संघर्षाची मालिका 1988 पासून सुरू झाली आणि 2018 पर्यंत या दोघांमधील एकूण 14 लढतींपैकी बांगलादेश संघाने 2012 मध्ये फक्त एकदाच 5 विकेट्सने विजय मिळवला होता. या 14 पैकी 2016 मध्ये टी-20 एशिया कपमध्ये दोन सामने झाले आणि ते दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले.
खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान अपडेट
आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरली आहे. त्यामुळे या सामन्यात मोठी धावसंख्या होऊ शकते. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे फायदेशीर ठरू शकते. कोलंबोमध्ये 15 सप्टेंबरच्या हवामान अंदाजानुसार, रात्री आणि सकाळी 8 ते 9 या वेळेत गडगडाटी वादळाची शक्यता आहे. दुपारी ३ वाजता सामना सुरू असतानाही पावसाची शक्यता आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2023 07:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

