Asia Cup 2023: पाकिस्तान ‘या’ स्वरूपात 2023 मध्ये करणार आशिया चषकचे आयोजन, PCB अध्यक्ष रमीज राजाची पुष्टी

पाकिस्तानमध्ये 2023 आशिया चषक 50 षटकांचा खेळला जाईल अशी पुष्टी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीज राजा यांनी केली. आशियाई क्रिकेट परिषदेने ही स्पर्धा त्याच स्वरुपात आयोजित करण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. तथापि, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने देखील पुरेसे संकेत देखील दिले की नजीकच्या भविष्यात भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका होण्याची शक्यता फारच कमी आहे.

Asia Cup 2023: पाकिस्तान ‘या’ स्वरूपात 2023 मध्ये करणार आशिया चषकचे आयोजन, PCB अध्यक्ष रमीज राजाची पुष्टी
PCB प्रमुख रमीज राजा (Photo Credit: PTI)

पाकिस्तानमध्ये 2023 आशिया चषक (Asia Cup) 50 षटकांचा खेळला जाईल अशी पुष्टी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांनी केली. आशियाई क्रिकेट परिषदेने (Asian Cricket Council) ही स्पर्धा त्याच स्वरुपात आयोजित करण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. तथापि, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने देखील पुरेसे संकेत देखील दिले की नजीकच्या भविष्यात भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका होण्याची शक्यता फारच कमी आहे कारण ‘आरामदायक पातळी’ गाठण्यासाठी ‘अजून बरेच काम करणे बाकी आहे.’ अलीकडेच राजा दुबईत एसीसीच्या (ACC) बैठकीला उपस्थित होते जेथे त्यांनी आशिया चषकच्या फॉरमॅटवर चर्चा केली आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्यासोबत बैठकही घेतली. “एसीसीने मान्य आणि मंजूर केले आहे की पाकिस्तानमध्ये 2023 ची स्पर्धा 50 षटकांची असेल आणि सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाईल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये (भारतात) होणाऱ्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 शी हे खूप छान जुळते,” राजाने पीसीबीच्या अधिकृत वेबसाइटवर सांगितले.

राजा म्हणाले की, ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाईल. पण सध्याचे राजकीय वातावरण कायम राहिल्यास भारतीय संघ शेजारील राष्ट्राच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता शून्य आहे. अशा परिस्थितीत अशी अपेक्षा केली जाऊ शकते की, 2018 प्रमाणे ही स्पर्धा दुबईला हलवली जाईल. “आम्ही पाकिस्तानमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक आहोत आणि मला विश्वास आहे की हा एक सुनियोजित कार्यक्रम असेल कारण चाहत्यांना हेच हवे आहे. पुढील वर्षी श्रीलंकेत होणारी स्पर्धा 20 षटकांच्या स्वरूपात खेळली जाईल आणि 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्रस्तावना असेल,” असेही राजा यांनी पुष्टी केली आहे.

दुसरीकडे, बीसीसीआय अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीबद्दल राजा म्हणाले: “पाकिस्तान-भारत क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बरेच काम करण्याची गरज आहे परंतु दोन्ही बोर्डांमध्ये काही आरामदायी पातळी असणे आवश्यक आहे आणि मग आपण किती दूर जाऊ शकतो ते पाहू शकतो. एकूण, आमची चांगली चर्चा झाली.” भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेर 2012 मध्ये द्विपक्षीय मालिका खेळली गेली जेव्हा पाक संघ भारत दौऱ्यावर आला होता.

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2021 08:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).