राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus In Maharashtra) रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात येत्या 28 मार्च पासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew In Maharashtra) लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकण्याबाबात आणि कडक निर्बंध लावण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)