Mumbai Rains: किनारपट्टी भागात जाणे टाळा, गरज असल्यास घराबाहेर पडा; मुंबई पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर पाहून नागरिकांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबईकरांना पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Mumbai Rains: किनारपट्टी भागात जाणे टाळा, गरज असल्यास घराबाहेर पडा; मुंबई पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन
Mumbai Police | (Photo Credits: File Image)

Mumbai Rains: मुंबईत सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain)जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर पाहून नागरिकांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबईकरांना पोलिसांकडून(Mumbai Police) करण्यात आले आहे. त्याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांक डायल करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळत आहे. त्यावर सतर्कतेचे पाऊल हे नेहमीच मुंबई पोलिसांकडून उचलण्यात येते. (हेही वाचा:Tulsi Lake Overflow: मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो (Watch Video) )

पोस्ट पहा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2024 01:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).