सध्या एनसीबीचे समीर वानखेडे हे बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात चौकशी करत आहेत. मात्र गेले काही दिवस महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक सतत एनसीबीच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करत वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. आजही मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, 'राज्य सरकारकडून चौकशीचा प्रश्न नाही कारण, समीर वानखेडे हे एका केंद्रीय एजन्सीद्वारे काम करत आहेत. मला नवाब मलिक यांच्या वक्तव्याबाबत कोणतीही माहिती नाही. त्यांनी मला याबाबत कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. मी त्याच्याकडून याबाबत माहिती घेईन, मात्र सध्या माझ्याकडे कोणतीही माहिती नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)