Mumbai Traffic Rules Violations: ई-बाईकविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांची विशेष कारवाई मोहीम; 1,176 उल्लंघन करणाऱ्यांकडून गोळा केला 1.63 लाख दंड
मुंबई वाहतूक विभागाकडे वाहतूक नियमभंगाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. असे आढळून आले आहे की, ई-बाईक रायडर्स, विशेषत: खाद्यपदार्थ आणि इतर डिलिव्हरी ॲप भागीदार, अनेकदा वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात,
Mumbai Traffic Rules Violations: वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत (Traffic Rules Violations) अनेक अहवाल प्राप्त झाल्यानंतर, मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) ई-बाईक चालकांवर, विशेषत: फूड डिलिव्हरी ॲप्ससाठी काम करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली. नुकतेच 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या विशेष कारवाई दरम्यान, वाहतूक पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत 221 ई-बाईक स्वारांविरुद्ध गुन्हा दाखल केला, यासह त्यांनी 290 ई-बाईकही जप्त केल्या.
ई-बाईक चालकांबाबत, ते हेल्मेट घालत नाहीत, वाहनाची वजन क्षमता ओलांडतात, वेग मर्यादेपेक्षा आक्रमकपणे वाहन चालवतात आणि बेपर्वा वाहन चालवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑटो रिक्षांना ओव्हरटेक करतात, ई-बाईकर्स ट्रॅफिक लाइट्सकडे दुर्लक्ष करतात, आपल्याला ट्रॅफिक नियम लागू होत नाहीत असे त्यांना वाटते, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
पहा पोस्ट-
In a special drive against E-bikes across the city from 9th to 11th August 2024, action has been taken against 1176 E-bikes collecting fines worth Rs 1,63,400/-.
290 E-bikes were seized and cases registered against 221 E-bikes. #ActionAgainstEBikes#DriveSafe pic.twitter.com/b1wKckZgJG
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 12, 2024
ई-बाईक चालकांबाबत असे अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या 272 ई-बाईक स्वारांना, सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याबद्दल 491, प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याबद्दल 252, आणि नागरी कृत्यांचे उल्लंघन केल्याबद्दल 161 रायडर्सना दंड ठोठावला, एकूण 1176 रायडर्सना दंड ठोठावला. 1,176 उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण 1.63 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. (हेही वाचा; Mumbai Metro 2A Ridership: मुंबई मेट्रो 2A ची रायडरशिप नियोजित संख्येपेक्षा तब्बल 55% कमी; केवळ 35,88,870 सरासरी मासिक प्रवासी)
ट्रॅफिक पोलीस फूड ॲप सेवेशी संपर्क साधून या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या धोरणांची चौकशी करतील. मिड-डेच्या वृत्तानुसार एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘यामुळे केवळ त्यांचाच जीव धोक्यात येत नाही, तर इतरांनाही मोठा धोका निर्माण होतो. या वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून, मुंबई वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि प्रत्येकासाठी सुरक्षित रस्ते सुनिश्चित करण्यासाठी ही विशेष मोहीम सुरू केली आहे.’
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 7933 05:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

