Mandwa Ferry Mishap: मांडवा दुर्घटनेनंतर निलंबित झाला अजिंठा कॅटामरनचा परवाना; तपासासाठी 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्वेक्षण प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले. मंत्री राणे यांच्या निर्देशानंतर, कंपनीचे प्रवासी कामकाज पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आले आहे, याची डीआयओने पुष्टी केली.
रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबागजवळ (Alibaug) अजिंठा कंपनीच्या (Ajanta Company) कॅटामरन प्रवासी बोटीशी संबंधित अलिकडच्या घटनेनंतर, बोट कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. रायगडच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी (डीआयओ) जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती देण्यात अली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे, जी या दुर्घटनेची सविस्तर चौकशी करेल आणि तीन दिवसांत राज्य सरकारला अहवाल सादर करेल. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
बुधवारी संध्याकाळी 130 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट गेटवे ऑफ इंडियाहून मांडवाकडे जात असताना, मांडवा जेट्टीपासून सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर समुद्राचे पाणी जहाजात शिरू लागले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आणि त्यांनी तात्काळ मदतीसाठी हाक मारली. जवळच्या बोटींनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बोटीमधून बाहरे काढले. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. यावेळी कोणतीही दुखापत झाली नसली तरी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिस्थिती गंभीर धोका निर्माण करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा: Woman Dies on IndiGo Airlines Flight: इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात महिलेचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आले विमानाचे इमर्जन्सी लँडिंग)
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्वेक्षण प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले. मंत्री राणे यांच्या निर्देशानंतर, कंपनीचे प्रवासी कामकाज पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आले आहे, याची डीआयओने पुष्टी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, मंत्री राणे यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि जीव धोक्यात आणणारा कोणतीही निष्काळजीपणा खपवून घेतली जाणार नाही यावर भर दिला. त्यांनी अधिकाऱ्यांना जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी स्पष्ट आणि कडक ऑपरेशनल आणि तांत्रिक मार्गदर्शक तत्त्वे स्थापित करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बडिये यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना जाहीर केली आहे. मुख्य सागरी सर्वेक्षणकर्ता आणि अभियंता प्रकाश चव्हाण हे या समितीचे अध्यक्ष असतील, तर प्रादेशिक बंदर अधिकारी (वांद्रे) सीजे लेपांडे सदस्य असतील आणि सागरी सुरक्षा अधिकारी कमांडंट संतोष नायर सदस्य-सचिव म्हणून काम पाहतील. ही समिती घटनेची सखोल तपासणी करेल, त्याचे मूळ कारण शोधून काढेल आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृतीयोग्य शिफारसी देईल. हा अहवाल तीन दिवसांत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणे अपेक्षित आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2025 08:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

