Gold Donate to Vitthal Mandir: पंढरपूर विठ्ठल-रखुमाई चरणी सोन्याचे पावणे दोन किलो दागिने अर्पण, जालना येथील विठ्ठलभक्ताची अनोखी
अवघ्या वैष्णवांचा मेळा भरणाऱ्या पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल-रखुमाई (Shri Vitthal Rukmini) चरणी एका भक्ताने भरभरुन दान दिले आहे. या भक्ताने विठ्ठल-रखुमाई चरणी सोन्याचे तब्बल पावणेदोन किलो दागिने अर्पण केले आहेत. मोहिनी एकदशी निमित्त जालना (Jalna) येथील एका भक्ताने हे दागिणे अर्पण केले आहेत.
अवघ्या वैष्णवांचा मेळा भरणाऱ्या पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल-रखुमाई (Shri Vitthal Rukmini) चरणी एका भक्ताने भरभरुन दान दिले आहे. या भक्ताने विठ्ठल-रखुमाई चरणी सोन्याचे तब्बल पावणेदोन किलो दागिने अर्पण केले आहेत. मोहिनी एकदशी निमित्त जालना (Jalna) येथील एका भक्ताने हे दागिणे अर्पण केले आहेत. हे दागिणे अर्पण करणाऱ्या भक्ताचे नाव समजू शकले नाही. भक्तानेच आपले नाव कुठेही जाहीर करु नये अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही.
प्राप्त माहतीनुसार, जालनायेथील एक भक्ताने मोहिनी एकादशीचे निमित्त साधले आणि विठूरायाचरणी भरभरुन दान दिले. या दानामध्ये सोन्याचे धोतर, कंठी आणि सोने-चंदनाचा हा असा दागिणे स्वरुपातील ऐवज आहे. विशेष म्हणजे या भाविकाने या आधीही अशाच प्रकार 80 लाख रुपयांचे दान विठ्ठल-रखुमाई चरणी दिले होते.
पंढरपूरच्या विठ्ठलाचे जगभरात भक्त आहेत. आषाढी कार्तिकी आणि वर्षातील इतरही अनेक दिवशी, एकादशींना हे भक्त पंढरपूरमध्ये हजेरी लावतात. गंगेच्या वाळवंटी स्नान करतात. भगव्या पताका आणतात आणि विठ्ठलचरणी नतमस्तक होऊन ते मोठ्या प्रमाणावर दानही करतात. या भक्तानेही नाव न छापण्याच्या अटीवर आपण हे दान देत असल्याचे म्हटले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी ही एक हिंदू देवता आहे. ज्याचे पंढरपूर येथे मंदिर आणि जगभरात भक्त आहेत. विठ्ठलास भगवान विष्णूचे एक रूप मानले जाते आणि त्याला अनेकदा भगवान विठ्ठल किंवा पांडुरंगा म्हणून संबोधले जाते. रुक्मिणी ही भगवान विठ्ठलाची पत्नी आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची पूजाही केली जाते. भगवान विठ्ठलाचे मंदिर महाराष्ट्रातील पंढरपूर येथे आहे, जे भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते.
भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या पूजेला महाराष्ट्रात भक्ती आणि भक्तीची मोठी परंपरा आहे. भगवान विठ्ठलाचे भक्त वारकरी म्हणून ओळखले जातात आणि ते दरवर्षी पंढरपूरला वारी काढतात. वारी आषाढ महिन्यात (जून/जुलै) सुरू होते आणि आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी समाप्त होते, जो भगवान विठ्ठलाचा जन्मदिवस मानला जातो.
भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या भक्तांचा असा विश्वास आहे की त्यांची भक्ती आणि प्रामाणिकपणे पूजा केल्याने समृद्धी, आनंद आणि आध्यात्मिक उन्नती होते अशी धारणा आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2023 11:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

