Kharmas 2022: खरमास म्हणजे काय? तो कधीपासून सुरू होतो? या काळात काय करावे? काय करू नये? जाणून घ्या

खरमासाच्या काळात विवाह, मुंडन विधी, यज्ञोपवीत, पायाभरणी शुभ मुहूर्त इत्यादी शुभ कार्ये केली जात नाहीत. सुख-समृद्धी आणि पुण्य वाढीसाठी खरमासामध्ये काही धार्मिक कार्य सांगितले आहेत.

Kharmas 2022: खरमास म्हणजे काय? तो कधीपासून सुरू होतो? या काळात काय करावे? काय करू नये? जाणून घ्या
Kharmas 2022 (PC - File Image)

Kharmas 2022: जगाची दृश्य देवता भगवान सूर्य डिसेंबर महिन्याच्या मध्यात धनु राशीत प्रवेश करतो. 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करताच खरमास (Kharmas) सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले तर खरमास वर्षातून दोनदा येतो. जेव्हा सूर्य गुरूच्या राशीत धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हाच खरमास असतो. खरमासात देवगुरु बृहस्पतीच्या घरी पोहोचताच सूर्य आपले तेज कमी करतो, अशा स्थितीत पृथ्वीवरील सूर्याचे तेज कमी होते. सूर्याच्या अशक्तपणामुळे महिनाभर शुभ कार्ये थांबतात. अशा स्थितीत शुभ कार्य अपूर्ण राहण्याची शक्यता असते, त्यामुळे या काळात परमेश्वराचे स्मरण करणे पुण्यकारक मानले जाते. खरमासाच्या काळात विवाह, मुंडन विधी, यज्ञोपवीत, पायाभरणी शुभ मुहूर्त इत्यादी शुभ कार्ये केली जात नाहीत. सुख-समृद्धी आणि पुण्य वाढीसाठी खरमासामध्ये काही धार्मिक कार्य सांगितले आहेत. (हेही वाचा - Sardar Vallabhbhai Patel Punyatithi 2022: सरदार वल्लभभाई पटेल यांचे Quotes शेअर करत पुढील पिढीपर्यंत पोहचवा त्यांच्या विचारांचा वारसा!)

खरमासात काय करू नये?

लग्न करू नका -

खरमासात लग्नासारखे शुभ कार्य करण्यास मनाई आहे. खरमासात लग्न केल्याने पती-पत्नीचे नाते कमकुवत होते, असे म्हटले जाते. म्हणूनच खरमासात लग्नासारखे शुभ कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो. 14 जानेवारी 2023 रोजी जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा लग्नासाठी शुभ मुहूर्त सुरू होईल. त्यानंतर तुम्ही शुभ कार्य करू शकता.

शुभ कार्य टाळा -

ज्योतिषाच्या मते, खरमासात इतर काही शुभ कामांवरही बंदी आहे. या काळात मुलांचे मुंडण केलं जात नाही. यामागील तर्क असा आहे की, जर हे संस्कार खरमासात केले गेले तर अशा मुलांशी घरातील सदस्यांचे संबंध बिघडतात. अशा परिस्थितीत मुलांना आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.

खरमासात हे करू नका -

इमारती बांधू नका -

खरमासात बांधलेली घरे मुळात कमकुवत मानली जातात. वास्तविक सूर्याच्या खरमास अशक्तपणामुळे त्याचा प्रकाश पृथ्वीवर योग्य प्रकारे पोहोचत नाही. यामुळे घरातील सिमेंट, विटा इत्यादी व्यवस्थित सुकत नाहीत आणि घर कमकुवत राहते.

आपल्या जीवनात सूर्यदेवाचे खूप महत्त्व आहे. सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्याच्या कमतरतेचा आपल्या दैनंदिन व्यवहारांवर, विचारशक्तीवर, निर्णय घेण्याची क्षमता आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो. त्यामुळे नात्यात अडथळे येऊ नयेत असे वाटत असेल तर खरमासात शुभ कार्य करणे टाळा.

नातेसंबंध सुधारण्यासाठी खरमासातील इतरही काही गोष्टींची काळजी घ्या. खरमासात भांडणे टाळा. घरातील वादात बाहेरच्या लोकांना गुंतवू नका. तुमच्या कामावर लक्ष द्या आणि धीर धरा. कुटुंबाच्या सुखासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2022 01:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).