Vande Bharat Express आता -10 अंश सेल्सिअस तापमानात पर्वत आणि बर्फाळ भागातून धावणार; हिमवर्षावाचा देखील होणार नाही परिणाम

आता वंदे भारत ट्रेन लवकरच पहिल्यांदाच डोंगरात वेगाने धावताना दिसणार आहे. पर्वतांवर बर्फवृष्टी (Snowfall) मुळे रेल्वेची सुविधा फारच कमी आहे. मात्र, आता रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस पर्वतांवर चालवण्याची तयारी करत आहे.

Vande Bharat Express आता -10 अंश सेल्सिअस तापमानात पर्वत आणि बर्फाळ भागातून धावणार; हिमवर्षावाचा देखील होणार नाही परिणाम
Vande Bharat Express will run through mountains (फोटो सौजन्य - X/@trainwalebhaiya)

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसने (Vande Bharat Express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ही ट्रेन आता देशाच्या अनेक भागांमध्ये वेग वाढवत आहे, परंतु आतापर्यंत पर्वतांनी तिला स्पर्श केला नव्हता. परंतु, आता वंदे भारत ट्रेन लवकरच पहिल्यांदाच डोंगरात वेगाने धावताना दिसणार आहे. पर्वतांवर बर्फवृष्टी (Snowfall) मुळे रेल्वेची सुविधा फारच कमी आहे. मात्र, आता रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस पर्वतांवर चालवण्याची तयारी करत आहे.

-10 डिग्री सेल्सिअस तापमानात धावणार वंदे भारत -

प्राप्त माहितीनुसार, पीएम मोदींच्या मेक इन इंडियाच्या व्हिजनच्या धर्तीवर विशेष वंदे भारत तयार करण्यात आली आहे. जी बर्फवृष्टी आणि उणे 10 अंश सेल्सिअस तापमानामध्येदेखील धावणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्याने काश्मीर खोऱ्यातील विविध भागात आरामदायी रेल्वे सुविधा उपलब्ध होऊ शकतात. (हेही वाचा - Vande Bharat Express: पुणेकरांसाठी खुशखबर! शेगाव, वडोदरासह 4 नवीन मार्गांवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन्स, जाणून घ्या सविस्तर)

उधमपूर-बारामुल्ला प्रकल्प-

उधमपूर-बारामुल्ला प्रकल्प 1898 मध्ये पहिल्यांदा सुरू होणार होता, परंतु त्यावेळची परिस्थिती पाहता डोंगराळ भागात ट्रॅक टाकण्यात अडचणी आल्या. त्यावेळी ते शक्य झाले नाही. उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता अमरेंद्र कुमार चंद्रा यांनी वंदे भारतच्या या स्पेशल ट्रेनबद्दल बोलताना सांगितले की, ट्रेन चालवताना विंडशील्डवर बर्फ साचू नये यासाठी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. (हेही वाचा - Vande Bharat Train Maharashtra: पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे महाराष्ट्रात 3 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळापत्रक)

ट्रेनची विंडशील्ड आपोआप गरम होणार -

चंद्रा यांनी पुढे बोलताना सांगितले की, ट्रेनची विंडशील्ड आपोआप गरम होते. त्यामुळे त्यावर बर्फ जमा होणार नाही. याशिवाय, वायपरमधून गरम पाणी देखील येईल जेणेकरून गोठलेला बर्फ व्यवस्थित साफ करता येईल. याव्यतिरिक्त, ट्रॅक साफ करण्यासाठी बर्फ कटरचा वापर केला जाईल. याशिवाय, वॉशरूममध्ये तापमान नियंत्रित करण्याची सुविधा देखील आहे. ज्यामुळे एक निश्चित तापमान राखले जाते. या ट्रेनमध्ये एअर ड्रायर ब्रेक्सही बसवण्यात आले आहेत जेणेकरून कमी तापमानात आणि बर्फात ब्रेकमध्ये ओलावा राहणार नाही.

जम्मू ते श्रीनगर 4-5 तासांत पोहोचता येणार -

याशिवाय, वॉशरुममध्ये गरम पाण्यासाठी विशेष फिलामेंट्स बसवण्यात आले आहेत, जेणेकरुन 10 लिटरची टाकी वीज नसतानाही गरम राहू शकेल. ट्रेनच्या कामकाजाबाबत बोलताना सीपीआरओ हिमांशू शेखर यांनी सांगितले की, ती लवकरच सुरू होईल. ट्रेन तयार आहे, फक्त परवानगीची प्रतीक्षा आहे, परवानगी मिळताच ट्रेनचे संचालन सुरू होईल. ही ट्रेन सुरू होताच जम्मूहून श्रीनगरला 4-5 तासांत पोहोचता येईल.

(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2025 08:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).