Akhilesh Yadav on SP MLA Abu Azmi's Suspension: अखिलेश यादव यांच्याकडून सपा आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाचा निषेध
औरंगजेबावरील वक्तव्यावर सपा आमदार अबू आझमी यांना निलंबित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निर्णयावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी टीका केली. आझमी यांनी माफी मागितली असली तरी, राज्य सरकार कारवाईवर ठाम राहिले. उद्धव ठाकरे यांनी कायमचे निलंबनाची मागणी केली.
मुघल शासक औरंगजेबावरील वक्तव्यानंतर (Aurangzeb Remark) राज्य सरकारने सपा आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांना महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित केले. समाजवादी पक्षाचे (सपा) प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. यादव यांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र सरकारवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावण्याचा आणि वैचारिक विविधतेला दडपण्याचा आरोप केला आहे. तसेच, कारवाईने सत्य लपत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केवळ अधिवेशन संपेपर्यंत नव्हे तर कायमचे निलंबन करायला हवे, अशी सडेतोड भूमिका व्यक्त केली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गुलामगिरीत काय फरक राहील?
अबू आझमी यांच्या निलंबनावर प्रतिक्रिया देताना अखिलेश यादव यांनी एक्स (जुने ट्विटर) वर पोस्ट केली, त्यांनी मूळ हिंदी भाषेत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, जर निलंबनाचा आधार विचारसरणीने प्रभावित होऊ लागला, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गुलामगिरीत काय फरक राहील? त्यांनी सपा आमदाराचा बचाव केला आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना राजकीय दबावाने गप्प बसवता येणार नाही यावर भर दिला. आमचे आमदार असोत किंवा खासदार, त्यांचे निर्भय असणे अतुलनीय आहे. जर काही लोकांना असे वाटत असेल की 'निलंबन' करून सत्याच्या जिभेवर लगाम लावता येतो, तर हा त्यांच्या नकारात्मक विचारसरणीचा बालिशपणा आहे, असेही त्यांनी एक्सवर लिहिले. (हेही वाचा, SP MLA Abu Azmi Aurangzeb Row: औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या विधानाबद्दल अबू आझमींवर कारवाई; संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित)
अखिलेश यादव यांच्याकडून आझमींची पाठराखण
Following Maharashtra SP MLA Abu Azmi's suspension from the Budget Session of the Assembly over his statement on Aurangzeb, SP president Akhilesh Yadav tweets, "If the basis of suspension starts getting influenced by ideology, then what difference will there be between freedom of… pic.twitter.com/QcL1CI6qyu
— ANI (@ANI) March 5, 2025
माफी मागितल्यानंतरही अबू आझमी निलंबित
अबू आझमी यांना बुधवारी महाराष्ट्र विधानसभेतून उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले, त्यांनी माफी मागितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर ही कारवाई झाली. सपा नेत्याने स्पष्ट केले होते की, औरंगजेबावरील त्यांचे वक्तव्य ऐतिहासिक माहितीवर आधारित होते आणि कोणत्याही आदरणीय व्यक्तीचा अनादर करण्याचा हेतू नव्हता. तथापि, त्यांचे स्पष्टीकरण सत्ताधारी युतीला शांत करण्यात अयशस्वी ठरले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझमी यांची माफी नाकारली आणि म्हटले की, या विधानाचे परिणाम भोगावे लागतील. 'त्यांच्या विधानाचे त्यांना मोठे नुकसान होईल,' असे शिंदे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांची रोखठोक भूमिका
#WATCH | Mumbai: On Maharashtra SP MLA Abu Azmi's suspension from the Budget session of the Maharashtra Assembly, Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray says, "He should be permanently suspended. It should not just be for the Budget Session, the suspension should be permanent."… https://t.co/Pz33hO0rI3 pic.twitter.com/sJv17Z5mTb
— ANI (@ANI) March 5, 2025
शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी आझमी यांचे विधान पाहता त्यांना विधानसभेतून कायमचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यांना फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित करू नये; निलंबन कायमचे असावे, असे ठाकरे यांनी जाहीर केले. अखिलेश यादव यांच्या आक्षेपाला उत्तर देताना ठाकरे पुढे म्हणाले, "जर त्यांना आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांना आक्षेप घेऊ द्या. संपूर्ण महाराष्ट्राने अबू आझमी यांच्यावर आक्षेप घेतला आहे. जर त्यांना हवे असेल तर त्यांनी त्यांना उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी. त्यांना सत्य माहित नाही."
(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2025 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

