सध्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगानं मंत्रालयात बैठक झाली. यावेळी खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती आणि अनुषंगिक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. राज्याच्या क्रीडा विकासासाठी क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबआयने खुलासा केला आहे की, बहुतांश मीडिया रिपोर्ट हे तथ्यावर आधारीत नाहीत. सीबीआय सध्या सुरु असलेल्या चौकशीचा कोणताही तपशील शेअर करत नाही.

अरूणाचल प्रदेशात आज 214 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 92 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 574 वर पोहचली आहे. यापैकी 3 हजार 67 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 8 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्विट- 

 

हरियाणा येथील सुखदेव ढाब्यातील 65 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. ट्विट- 

  

भारत लोकशाही आणि विविधतेसाठी वचनबद्ध असलेले राजकीय स्थिरता आणि धोरणात्मक सातत्य असलेला देश आहे, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्हणाले आहेत. पीटीआयचे ट्वीट- 

 

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 18,105 रुग्ण आढळले तर 391 जणांचा बळी गेला आहे.

केरळात कोरोनाचे आणखी 1553 रुग्ण आढळले तर 10 जणांचा बळी गेला आहे.

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 1325 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 16 जणांचा बळी गेल्या 24 तासात गेला आहे.

गोव्यात कोरोनाचे आणखी 713 रुग्ण आढळल्याने आकडा 19,355 वर पोहचला आहे.

नॉन-अॅग्रिक्ल्चर विद्यापीठाच्या कुलगुरुंनी 31 ऑक्टोंबर पर्यंत निकाल जाहीर करण्यास अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी असे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे.

Load More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट काही काळासाठी हॅक झाले होते. हे खाते त्याच्या वैयक्तिक वेबसाइटचे होते. या खात्यावर त्यांचे 25 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. खाते हॅक केल्यानंतर हॅकर्सनी बिटकॉईनची मागणी करण्यास सुरवात केली. हॅकर्सनी ट्वीट करून क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये मदत देण्याची मागणी केली. मात्र त्यानंतर ताबडतोब हे खरे रिकव्हर केले गेले.

राजधानी मुंबई येथील आरे कॉलनीमध्ये मेट्रोचे कार शेड होणार नसल्याचा महत्वाचा निर्णय काल घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान अजूनही राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई सारख्या गर्दीच्या शहरामध्ये ही संख्या जरी कमी आली असली तरी, पुणे हे आता नवे हॉटस्पॉट बनले आहे. पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या देखील मुंबईच्या तुलनेत जास्त आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल संध्याकाळी दिलेल्या माहितीनुसार, काल राज्यात कोरोना विषाणूच्या 17,433 रुग्णांची नोंद झाली आहे, तर, 292 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8 लाखांच्या वर गेली आहे. यापैंकी 25,195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात काल 13,959 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 5,98,496 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.48 टक्के आहे. महाराष्ट्रात सध्या 2,01,703 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.