Agnipath Scheme: 'अग्निपथ' योजने बद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांवर गृह मंत्रालयाची नजर, 35 WhatsApp ग्रुपवर बंदी, 10 जणांना अटक

अग्निपथ योजनेच्या विरोधात राज्यांमध्ये हिंसक निदर्शने आणि जाळपोळ करण्याच्या घटनांदरम्यान, केंद्राने PIB फॅक्ट चेक टीम नंबर 8799711259 जारी केला आहे आणि नागरिकांना अशा कोणत्याही गटाची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

Agnipath Scheme: 'अग्निपथ' योजने बद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांवर गृह मंत्रालयाची नजर, 35 WhatsApp ग्रुपवर बंदी, 10 जणांना अटक
WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

'अग्निपथ' योजनेबाबत (Agnipath Scheme) सोशल मीडियावर (Social Media) चुकीची माहिती पसरवल्याबद्दल सरकारने (Central Govt) 35 व्हॉट्सअॅप (WhatsApp Groups) ग्रुपवर बंदी घातली आहे. 'फेक न्यूज' (Fake News) पसरवल्याबद्दल आणि निषेध आयोजित केल्याबद्दल 10 जणांना अटक करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात राज्यांमध्ये हिंसक निदर्शने आणि जाळपोळ करण्याच्या घटनांदरम्यान, केंद्राने PIB फॅक्ट चेक टीम नंबर 8799711259 जारी केला आहे आणि नागरिकांना अशा कोणत्याही गटाची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. सरकारने मंगळवारी सैन्य भरतीसाठी 'अग्निपथ योजना' जाहीर केली ज्याअंतर्गत चार वर्षांच्या अल्प कालावधीसाठी सैनिकांची भरती केली जाईल. ज्याला 'अग्नवीर' म्हणतील. या योजनेंतर्गत 75 टक्के अग्निवीर चार वर्षानंतर निवृत्तीवेतनाविना निवृत्त होतील तर 25 टक्के अग्निवीरांची पुनर्स्थापना सुरू राहील. लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये अग्निवीरांची भरती केली जाणार आहे.

अग्निपथ योजनेच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या विविध भागात हिंसक निदर्शने झाली आहेत. त्यामुळे 12 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बिहार सरकारने म्हटले होते की इंटरनेटचा वापर "आक्षेपार्ह सामग्री" प्रसारित करण्यासाठी जनतेला चिथावणी देण्याच्या आणि जीवित आणि मालमत्तेचे नुकसान करण्याच्या हेतूने अफवा पसरवण्यासाठी केला जात आहे. (हे देखील वाचा: Agnipath Scheme: 'अग्निपथ' योजना मागे घेणार नाही; आंदोलकांना सैन्यात प्रवेश नाही, सेना दलाची घोषणा)

Tweet

पाटणा जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले की बिहार अधिकारी कोचिंग सेंटर्सच्या संचालकांच्या भूमिकेची देखील चौकशी करत आहेत आणि त्यापैकी सात पटना जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत. आम्ही सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवले आहे. गरज पडल्यास आम्ही पाटण्यात इंटरनेट सेवा बंद करण्यास मागेपुढे पाहणार नाही. ताज्या माहितीनुसार पाटण्यात 190 आंदोलकांना अटक करण्यात आली असून 11 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. सहा कोचिंग संस्थांविरोधातही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये 24 तास इंटरनेट सेवा ठप्प आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2022 11:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).