Lok Sabha Elections 2019: शाहरुख-सलमान-आमिर या खान मंडळींसह बॉलिवूडचे 'हे' स्टार्स 29 एप्रिल रोजी मुंबईत बजावतील मतदानाचा अधिकार?
चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 17 मतदारसंघात मतदान होणार असून त्यात मायानगरी मुंबईचा देखील समावेश आहे. 29 एप्रिल रोजी मुंबईत मतदान असल्याने अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी मतदानाचा हक्क बजावतील.
लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) चे चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी होणार आहे. चौथ्या टप्प्यात बिहार, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातील मतदारसंघात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात 17 मतदारसंघात मतदान होणार असून त्यात मायानगरी मुंबईचा देखील समावेश आहे. 29 एप्रिल रोजी मुंबईत मतदान असल्याने अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी मतदानाचा हक्क बजावतील. मुंबई मतदान करणारे काही बॉलिवूड सेलिब्रेटी...
बॉलिवूडचे अनेक स्टार्स अनेकदा मतदानाविषयी जनजागृती करत मतदान करण्याचे आवाहन करत असतात. तसंच मतदान करुन लोकांना मतदानासाठी प्रोत्साहितही करतात. यंदा देखील अनेक बॉलिवूड स्टार्स मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या व्यग्र जीवनशैलीतून वेळ काढतील. (सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक यांच्यासह 'या' मराठी कलाकरांनी बजावला मतदानाचा अधिकार!)
शाहरुख खान (Shah Rukh Khan)
सलमान खान (Salman Khan)
आमिर खान (Aamir Khan)
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
अनुष्का शर्मा (Anuskha Sharma)
रणवीर सिंग (Ranveer Singh)
View this post on Instagram
श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)
रेखा (Rekha)
जोया अख्तर (Zoya Akhtar)
महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार असल्याने 29 एप्रिल रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडेल. मात्र देशात सात टप्प्यात मतदान होणार असल्याने 29 एप्रिल नंतर 6, 12 आणि 19 मे रोजी मतदान होईल. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल.
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2019 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

