Manika Batra Alleges Fixing in Olympics 2020: मनिका बत्राने टेबल टेनिस प्रशिक्षकावर केला मॅच फिक्सिंगचा धक्कादायक आरोप, पाहा काय म्हणाली
मनिका बत्रा (Photo Credit: PTI)

भारताची स्टार महिला टेबल टेनिसपटू (Table Tennis) मनिका बत्राने (Manika Batra) राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉयवर (Saumnyadeep Roy) खळबळजनक आरोप केले आहेत. मनिकाने म्हटले आहे की रॉयने तिला ऑलिम्पिक पात्रता (Olympic Qualifiers) दरम्यान मार्च महिन्यात एक सामना गमावण्यास सांगितले होते आणि म्हणूनच तिने टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 मध्ये त्यांची मदत घेण्यास नकार दिला होता. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या कारणे दाखवा नोटिसीला मनिकाने उत्तर दिले आहे आणि रॉयची मदत न घेतल्याने तिने खेळाला लाजवेल असे स्पष्टीकरण देत आरोप नाकारले आहे. TTFI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक क्रमवारीत 56 व्या क्रमांकावर असलेल्या मनिकाने असे म्हटले आहे की जर महिन्यापूर्वी तिला मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होण्यास कोणी विचारले असेल तर ती तिच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करू शकली नसती.

"त्यांच्या शेवटच्या मिनिटाच्या हस्तक्षेपामुळे अडथळा टाळण्याची गरज याशिवाय, राष्ट्रीय प्रशिक्षका शिवाय खेळणे माझ्या पसंतीमागे एक अतिरिक्त आणि बरेच गंभीर कारण होते," खेलरत्न पुरस्कार विजेतीने टीटीएफआय सचिव अरुण बॅनर्जी यांना दिलेल्या प्रतिसादात आरोप केला आहे. ती म्हणाली, "मार्च 2021 मध्ये दोहा येथे पात्रता स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षकाने माझ्यावर दबाव टाकला होता की, माझा सामना त्याच्या विद्यार्थ्यास जिंकावण्यासाठी गमवावा जेणेकरून तिला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरता येईल- थोडक्यात- मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी व्हावे." वारंवार प्रयत्न करूनही रॉय आरोपांच्या प्रतिसादासाठी उपलब्ध राहिले नाही. दरम्यान, रॉय यांना सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरात सामील होण्यास सांगण्यात आले नाही आणि टीटीएफआयने त्यांना आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. "हे आरोप रॉय यांच्या विरोधात आहेत. त्यांना उत्तर देऊ द्या आणि मगच आम्ही भविष्यातील कृती ठरवू," बॅनर्जी यांना कारण दाखवा नोटीसवर मनिकाच्या प्रतिसादाबद्दल विचारले असता ते म्हणाले.

रॉय हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे माजी सुवर्णपदक विजेते आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त आहेत. रॉय यांच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या मनिका आणि सुतीर्थ मुखर्जी दोघेही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. मनिकाने तिसरी फेरी गाठून इतिहास घडवला तर सुतीर्थनेही दुसऱ्या फेरीत पोहचून चांगली कामगिरी केली. टीटीएफआयने मनिकाने रॉयचा सल्ला न मानण्याला अनुशासनहीनता म्हटले होते आणि तिला कारणे नोटीस बजावली.