IND vs ENG T20I Series 2024: यशस्वी जैस्वालकडे कोहलीचा 'विराट' विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी! टी-20 मालिकेत करू शकतो कमाल

युवा यशस्वी जैस्वालची (Yashasvi Jaiswal) टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड होईल हे जवळजवळ निश्चित आहे. तो गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे आणि तो उत्तम फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत जैस्वाल घातक कामगिरी करु शकतो.

IND vs ENG T20I Series 2024: यशस्वी जैस्वालकडे कोहलीचा 'विराट' विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी! टी-20 मालिकेत करू शकतो कमाल
Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

India Natioan Cricket Team vs England National Cricket Team: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्यापूर्वी, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. युवा यशस्वी जैस्वालची (Yashasvi Jaiswal) टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड होईल हे जवळजवळ निश्चित आहे. तो गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे आणि तो उत्तम फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत जैस्वाल घातक कामगिरी करु शकतो. (हे देखील वाचा: IND vs ENG T20I Series 2025: इंग्लंड मालिकेसाठी 'या' वेगवान गोलंदाजाची निवड होणे कठीण, पाठीच्या दुखापतीमुळे कारकिर्दीवरही लागू शकतो ब्रेक)

टी-20 मध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश

यशस्वी जैस्वालने 2023 मध्ये भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हापासून, त्याने टी-20 सामन्यांच्या 22 डावांमध्ये धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. आता जर त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या चार डावात धावा केल्या तर तो भारतासाठी टी-20 मध्ये हजार धावा पूर्ण करणारा सर्वात जलद फलंदाज बनेल. तो फक्त डावांमध्ये हे करेल. यासाठी त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी-मालिकेत चमकदार कामगिरी करावी लागेल.

कोहली टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज

सध्या हा विक्रम धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 27 डावांमध्ये ही कामगिरी केली. केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 29 डावांमध्ये 1000 टी-20 सामने पूर्ण केले. सध्याचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने 31 डावांमध्ये 1000 टी-20 धावा पूर्ण केल्या. या फलंदाजांना मागे टाकण्याची जैस्वालकडे सुवर्णसंधी आहे.

भारतासाठी टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारे फलंदाज:

विराट कोहली - 27 डाव

केएल राहुल - 29 डाव

सूर्यकुमार यादव - 31 डाव

रोहित शर्मा – 40 डाव

भारतासाठी 19 कसोटी सामने खेळले 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जैस्वालने चांगली कामगिरी केली होती आणि संघासाठी 391 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. जयस्वालमध्ये मोठ्या खेळी खेळण्याची क्षमता आहे आणि तो काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्यात पटाईत आहे. त्याने आतापर्यंत टीम इंडियासाठी 19 कसोटी सामन्यांमध्ये 1798 धावा केल्या आहेत, ज्यात 4 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2025 06:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).