IND vs ENG 5th Test Pitch Report: धर्मशाळामध्ये फिरकीपटू कि वेगवान गोलंदाज कोण करणार कहर? जाणून घ्या कोणाला होणार खेळपट्टीचा फायदा
मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 7 मार्चपासून धर्मशाळेच्या (Dharamshala) मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने (Team India) मालिकेत आधीच 3-1 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाचे गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत.
IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी (IND vs ENG 5th Test) सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 7 मार्चपासून धर्मशाळेच्या (Dharamshala) मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने (Team India) मालिकेत आधीच 3-1 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाचे गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना इंग्लंडने नक्कीच जिंकला, पण त्यानंतर इंग्लिश संघाची प्रत्येक चाल प्रचंड फ्लॉप ठरली. अशा स्थितीत टीम इंडियाला शेवटचा कसोटी सामना जिंकून मालिका 4-1 ने जिंकायची आहे. चला जाणून घेऊया, धर्मशाळेच्या मैदानाची खेळपट्टी कशी असेल?
आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना झाला आहे
हिमाचल प्रदेशात पर्वताच्या शिखरावर धर्मशाळा मैदान आहे. या स्टेडियमची क्षमता 23000 हजार प्रेक्षकांची आहे. हे मैदान डोंगराच्या माथ्यावर आहे. त्यामुळे येथे जोरदार वारे वाहत आहेत. जे वेगवान गोलंदाजांना मदत करते. वेगवान गोलंदाज येथे नेहमीच धोकादायक ठरतात. भारतातील इतर मैदानांपेक्षा या मैदानावर जास्त गवत आहे. (हे देखील वाचा: R Ashwin: पाचव्या कसोटीपूर्वी अश्विनचा मोठा खुलासा, ती मालिका ठरली होती टर्निंग पॉईंट)
भारताने ऑस्ट्रेलियाचा केला होता पराभव
धर्मशाळाच्या मैदानावर आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना झाला आहे, ज्यामध्ये 2017 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात रवींद्र जडेजाने भारतासाठी बॉल आणि बॅटने अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानंतर त्याने 63 धावा केल्या आणि 4 विकेटही घेतल्या. भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
फिरकीपटूंना मिळू शकते मदत
गेल्या काही दिवसांपासून धर्मशाळेत पाऊस पडत होता. या कारणास्तव ग्राउंड स्टाफला त्यावर काम करण्यापासून थांबवण्यात आले. मात्र आता हवामान स्वच्छ झाल्यानंतर क्युरेटर्सना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. धर्मशाळेची मध्यवर्ती विकेट तपकिरी कागदाच्या कोऱ्या सीटसारखी दिसते. त्यामुळे फिरकीपटूंना मदत होईल, अशी अपेक्षा आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, कोणत्या प्रकारची खेळपट्टी द्यायची याबाबत क्युरेटर भारतीय संघ व्यवस्थापनाशी चर्चा करतील. त्यामुळे इंग्लंडला पुन्हा एकदा संथ आणि वळण घेणाऱ्या खेळपट्टीवर खेळावे लागणार असल्याचे दिसते. खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल असेल तर भारतीय संघाच्या फिरकीपटूंना लॉटरी लागू शकते.
या खेळाडूने केल्या सर्वाधिक धावा
केएल राहुलने धर्मशाळाच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत. त्याने एका कसोटी सामन्यात 111 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 60 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. या मैदानावर उमेश यादवने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. 2017 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या. मात्र हे दोन्ही खेळाडू सध्या बाहेर आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2024 09:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

