IND vs AFG 1st T20 Pitch Report: मोहालीच्या खेळपट्टीवर कोणाचे असणार वर्चस्व, फलंदाज की गोलंदाज? सर्व माहिती घ्या जाणून
जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2024) अफगाणिस्तानविरुद्धची ही मालिका भारतीय संघाची शेवटची मालिका असेल. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा संघाच्या तयारीवर लागल्या आहेत आणि त्यामुळेच तब्बल 15 महिन्यांनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) या फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी स्वीकारणार आहे, तर विराट कोहलीही (Virat Kohli) संघात परतला आहे.
IND vs AFG 1st T20: भारतीय क्रिकेट संघ 2024 मध्ये (Team India) 11 जानेवारीपासून घरच्या मैदानावर टी-20 (T20) फॉर्मेटमध्ये पहिली मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरेल. जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2024) अफगाणिस्तानविरुद्धची ही मालिका भारतीय संघाची शेवटची मालिका असेल. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा संघाच्या तयारीवर लागल्या आहेत आणि त्यामुळेच तब्बल 15 महिन्यांनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) या फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी स्वीकारणार आहे, तर विराट कोहलीही (Virat Kohli) संघात परतला आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli Record: विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या जवळ, कोणताही भारतीय फलंदाज करु नाही शकला 'हा' पराक्रम)
दव बजावू शकतो महत्वाची भूमिका
मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथे लहान चौकारांमुळे मोठी धावसंख्या सहज पाहायला मिळते. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, जेणेकरून दव पडल्यास, लक्ष्याचा पाठलाग करताना त्याचा फायदा घेता येईल. या स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
प्रथम फलंदाजी करणारा संघ नेहमी जिंकतो
आत्तापर्यंत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघ सर्व जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या 9 टी-20 सामन्यांमध्ये पहिल्या डावात सरासरी 168 धावा, तर दुसऱ्या डावात 152 धावा झाल्या आहेत. आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या 9 सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 वेळा विजय मिळवला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 4 वेळा सामना जिंकला आहे.
मोहालीत विराट कोहलीच्या नावावर आतापर्यंतचा मोठा विक्रम
भारतीय संघाच्या वतीने, आतापर्यंत या मैदानावर विराट कोहलीचा टी-20 आंतरराष्ट्रीय विक्रम खूपच उत्कृष्ट आहे. कोहलीने मोहालीमध्ये 3 सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन वेळा तो नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. या स्टेडियममध्ये कोहलीने 2 अर्धशतकांच्या जोरावर 156 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कोहलीचा विक्रम पाहिला तर त्याने तीन डावात 172 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2024 01:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

