IND vs WI: शुभमन गिलच्या रडारवर विराट कोहलीचा खास विक्रम; वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत इतिहास रचणार?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत सर्वांचे लक्ष भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल याच्यावर असेल. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर बॅटने धुमाकूळ घालणारा गिल या मालिकेत एका खास विक्रमावर लक्ष ठेवून आहे.
Shubman Gill can Broke Virat Kohli Record: २०२५ चा आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी क्रिकेटची तयारी करत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत सर्वांचे लक्ष भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल याच्यावर असेल. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर बॅटने धुमाकूळ घालणारा गिल या मालिकेत एका खास विक्रमावर लक्ष ठेवून आहे. हा विक्रम आहे महान फलंदाज विराट कोहलीच्या नावावर असलेला. तो मोडणे अत्यंत कठीण असले तरी, जर गिलची बॅट चांगली कामगिरी करत राहिली, तर ते शक्य होऊ शकते.
कोहलीचा विक्रम रडारवर
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३,००० धावा पूर्ण करण्याचा भारतीय विक्रम सध्या वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने केवळ ५५ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. त्यानंतर, विराट कोहलीला ३,००० धावा पूर्ण करण्यासाठी ७३ डाव लागले. आता, शुभमन गिल कोहलीच्या तुलनेत कमी डावांमध्ये ही कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
Team is back in training ahead of the series#INDvsWI #ShubmanGill #gautamgambhir pic.twitter.com/l2kK4fGCJG
— Sports Yaari (@YaariSports) September 30, 2025
गिलने आतापर्यंत ६९ डाव खेळले आहेत आणि त्याच्या नावावर २,६४७ धावा आहेत. त्याला कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी फक्त ३५३ धावांची गरज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला तीन ते चार डाव मिळतील. अशा परिस्थितीत, गिल कोहलीचा विक्रम मोडेल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इंग्लंड दौऱ्यावर गिलची धमाकेदार कामगिरी
शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत शानदार फलंदाजी केली होती. त्याने १० डावांमध्ये ७५.४० च्या सरासरीने ७५४ धावा केल्या, ज्यात चार शतकांचा समावेश होता. तो मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या दमदार कामगिरीसाठी त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
शुभमन गिलची कसोटी कारकीर्द
शुभमन गिलने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून तो टीम इंडियाचा नियमित सदस्य आहे. त्याने आतापर्यंत ३७ कसोटी सामन्यांमध्ये ६९ डावांमध्ये ४१.३६ च्या सरासरीने २,६४७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर नऊ शतके, एक द्विशतक आणि सात अर्धशतके आहेत. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर त्याला कर्णधारपदही देण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

