Virat Kohli Wicket-keeping: एमएस धोनीच्या जागी जेव्हा विराट कोहलीने केली विकेटकिपिंग, विनोदी अंदाजात कहाणी सांगत 'कॅप्टन कूल'चे केले कौतुक (Watch Video)
2015 बांग्लादेशविरुद्ध वनडे सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची स्टम्पच्या मागे थोड्या वेळासाठी जागा घेतलेल्या घटनेचा किस्सा सांगितला. धोनी 43 व्या ओव्हरपूर्वी काही कारणास्तव मैदानाबाहेर गेला तेव्हा त्याने विराटला विकेटकिपिंग करण्याची जबाबदारी दिली होती.
2015 बांग्लादेशविरुद्ध (Bangladesh) वनडे सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) स्टम्पच्या मागे थोड्या वेळासाठी जागा घेतलेल्या घटनेचा किस्सा सांगितला. धोनी 43 व्या ओव्हरपूर्वी काही कारणास्तव मैदानाबाहेर गेला तेव्हा त्याने विराटला विकेटकिपिंग करण्याची जबाबदारी दिली होती. बांग्लादेशविरुद्ध वनडे सामन्यादरम्यान बाथरूम ब्रेक घेण्याची आवश्यकता असल्याने कोहलीला स्टम्पच्या मागे राहण्यास सांगितले होते. BCCI.tvवर मयंक अग्रवालशी झालेल्या मुलाखती दरम्यान कोहलीने विविध आठवणींना उजाळा दिला त्यातील एक म्हणजे विकेटकीपर म्हणून त्याने निभावलेली भूमिका. कोहलीने आपल्या विनोदी शैलीत कहाणी सांगितली आणि म्हणाला की, त्याला प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करावे लागते तर त्याचवेळी मैदानावर बदल करावे लागतात. (काय! विराट कोहली 4-5 दिवसांत 40 टॉफींचे पॅक खायचा, 2012 आयपीएलने अशा प्रकारे आहार व प्रशिक्षण बदलण्यास केले प्रवृत्त Watch Video)
या घटनेबद्दल बोलताना विराट म्हणाला,"हे कसे घडले याबद्दल कधी माही भाईला प्रयत्न करून पहा. तो म्हणाला की, भावा फक्त दोन-तीन ओव्हरसाठी विकेट सांभाळ. मी विकेट राखत होतो आणि मैदानावर बदलही करीत होतो," कोहलीने सांगितले. "मग मला समजले की जेव्हा तो मैदानावर असतो तेव्हा त्याच्याकडे प्लेटवर बरेच काही होते कारण त्याला प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करावे लागते आणि फील्ड देखील समायोजित करावे लागते." वेगवान गोलंदाज उमेश यादव त्याची घातक गोलंदाजी करत होता आणि हा चेंडू त्याच्या नाकाला लागण्याची भीती त्याला होती, असे कोहलीने उघड केले. परंतु हेल्मेट तो अपमानजनक वाटेल म्हणून त्याने परिधान केले नाही.
The much awaited Part 2 featuring King Kohli on #OpenNetsWithMayank is OUT NOW.
In this candid chat with @mayankcricket, @imVkohli reminisces some good old days, opens up about some of his life changing moments and more...
Full episode - https://t.co/RZrsPT5sxk@SDhawan25 pic.twitter.com/TUNCWpjIpi
— BCCI (@BCCI) July 28, 2020
"एक अडचण म्हणजे उमेश गोलंदाजी करत होता आणि तो गॅस गोलंदाजी करत होता. मला वाटले की नाकावर बॉल लागेल आणि मला हेल्मेट घालायचं आहे पण मग वाटलं खूप अपमानजनक असेल," त्याने पुढे म्हटले. चॅट शोच्या आधीच्या एपिसोडमध्ये कर्णधार विराटने दावा केला की कोणत्याही परिस्थितीत तो निकालासाठी तडजोड करणार नाही आणि सामना ड्रॉ करणे त्याच्यासाठी पर्याय नाही. कोहलीने मयंकला सांगितले की, जर संघाला शेवटच्या दिवशी 10 विकेट असताना 300 धावांचा पाठलाग करण्याची परिस्थिती निर्माण केली तर तो कधीही ड्रॉ साठी जाऊ शकत नाही.
(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2020 03:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

