Virat Kohli New Record: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अंतिम फेरीत केला एक अनोखा विक्रम, या प्रकरणात पोहोचला दुसऱ्या क्रमांकावर
विराट कोहली कोहली टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. या सामन्यात विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 300 झेल घेण्याचा विक्रम केला आहे. टीम इंडियासाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2023) लंडनमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर एक रंजक विक्रम नोंदवला गेला आहे. विराट कोहली कोहली टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. या सामन्यात विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 300 झेल घेण्याचा विक्रम केला आहे. टीम इंडियासाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने 270 धावा करून दुसरा डाव घोषित केला. या खेळीदरम्यान विराट कोहलीने मिचेल स्टार्कचा झेल टिपला.
मिचेल स्टार्क 57 चेंडूत 41 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे विराट कोहलीने एक खास कामगिरी आपल्या नावावर केली. विराट कोहलीने आतापर्यंत भारताकडून खेळलेल्या 498 सामन्यांमध्ये 301 झेल घेतले आहेत. यामध्ये वनडे, टी-20 आणि टेस्ट फॉरमॅटचा समावेश आहे. किंग कोहलीने एका सामन्यात सर्वाधिक 3 झेल घेतले आहेत. (हे देखील वाचा: Rohit Sharma New Record: कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रचला इतिहास, सचिन तेंडुलकरला या बाबतीत टाकले मागे)
भारताकडून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम माजी कर्णधार राहुल द्रविडच्या नावावर आहे. राहुल द्रविडने 504 सामन्यात 333 झेल घेतले आहेत. राहुल द्रविडने एका सामन्यात सर्वाधिक 4 झेल घेतले आहेत. या बाबतीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्माने 441 सामन्यात 195 झेल घेतले आहेत. या यादीत मोहम्मद अझरुद्दीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद अझरुद्दीनने 433 सामन्यात 261 झेल घेतले आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 256 झेल घेतले आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 469 धावा केल्या होत्या. त्याचवेळी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 270 धावा करून डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात अॅलेक्स कॅरीने सर्वाधिक नाबाद 66 धावा केल्या. यादरम्यान टीम इंडियाकडून अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी 2-2 विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 444 धावा करायच्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2023 10:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

