IND vs AUS 2nd Test 2023: दिल्लीत 36 वर्षांपासून टीम इंडियाचा आहे जबरदस्त रेकॉर्ड, आकडेवारी पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना फुटेल घाम
Team India (Photo Credit - Twitter)

IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy 2023) ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने(Team India) एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला होता. आता दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात पहिल्याच पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ बॅकफूटवर आहे. दुसरीकडे दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाचा विक्रम पाहिला तर त्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. (हे देखील वाचा: IND vs AUS Test Series 2023: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर Jasprit Bumrah आणखी एका मालिकेतून बाहेर, आता थेट दिसणार आयपीएलमध्ये)

अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. टीम इंडियाने गेल्या 36 वर्षांपासून अरुण जेटली स्टेडियमवर एकही सामना गमावलेला नाही. या मैदानावर भारतीय संघाचा शेवटचा पराभव 1987 मध्ये वेस्ट इंडिजकडून झाला होता. त्यानंतर टीम इंडियाने अनेक मोठ्या संघांना पराभूत केले आहे. 2017 मध्ये शेवटच्या वेळी टीम इंडिया या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळली होती, जी अनिर्णित राहिली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धही मजबूत रेकॉर्ड

दुसरीकडे, अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड पाहिला, तर तोही उत्कृष्ट ठरला आहे. या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 7 सामने झाले आहेत. त्यापैकी भारतीय संघाने 3 तर ऑस्ट्रेलियन संघाने 1 सामन्यात विजय मिळवला आहे. तेथे 3 सामने अनिर्णित राहिले. शेवटच्या वेळी 2013 मध्ये या मैदानावर भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाशी टक्कर झाली होती आणि तिथे टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला होता. तर ऑस्ट्रेलियाने 1959 मध्ये एकमेव विजय नोंदवला होता. अशा परिस्थितीत हे विक्रम पाहून ऑस्ट्रेलियन संघ नक्कीच चिंतेत असेल.

विराटचे आकडेही आहेत जोरदार 

दुसरीकडे, अरुण जेटली स्टेडियममधील विराट कोहलीच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर तोही अप्रतिम आहे. या मैदानावर विराटने एकूण 3 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 6 डावात 467 धावा केल्या. तर विराटची सर्वोत्तम धावसंख्या 243 आहे. त्याचवेळी त्याची सरासरीही 77.83 झाली आहे. या मैदानावर विराटने 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत दीर्घकाळापासून कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील असलेला विराट दिल्लीत चमत्कार घडवू शकतो.