Team India: नव्या वर्षात टीम इंडियासमोर उभी आहेत ही 3 आव्हाने, रोहित-द्रविडला पार पाडावी लागणार

टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर आशिया कपमध्येही संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे 2023 साली कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत.

Team India: नव्या वर्षात टीम इंडियासमोर उभी आहेत ही 3 आव्हाने, रोहित-द्रविडला पार पाडावी लागणार
राहुल द्रविड आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

Team India: भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून वर्षाचा शेवट उत्कृष्टरित्या केला. पण टीम इंडियाला आयसीसी टूर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर आशिया कपमध्येही संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे 2023 साली कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत कायम आहे. भारत सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. आता भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल. तरच टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकेल.

भारत एकदिवसीय विश्वचषकाचे यजमान 

भारत 2023 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. टीम इंडियाने 1983 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. 2013 पासून भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत रोहित आणि कंपनीला क्रिकेटच्या महाकुंभात सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना चमत्कार करावे लागतील. (हे देखील वाचा: WTC Final Race: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर, फायनलसाठी पात्र होण्यासाठी भारताचा कसा असेल पुढचा मार्ग?)

स्टार खेळाडू फॉर्मात नाहीत

कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली दीर्घकाळ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसत नाहीत. भारतीय टॉप ऑर्डर खराब टप्प्यातून जात आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी या खेळाडूंना आपल्या लयीत यावे लागेल. खराब फॉर्ममुळे या खेळाडूंना संघातून वगळण्याची मागणी होत आहे. त्याच वेळी, ईशान किशन आणि शुभमन गिलसारखे युवा खेळाडू त्यांची जागा घेण्यास तयार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2022 11:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).