T20 World Cup 2022: रोहितने पहिल्यांदाच बुमराहबद्दलचे मौन तोडले, शमीला का मिळाली संधी सांगितले
बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची (Mohammed Shami) वर्ल्ड कप संघात निवड करण्यात आली आहे. मात्र काही क्रिकेट चाहत्यांना याचा फारसा आनंद झाला नाही. मात्र, आता संघाचा कर्णधार रोहित शर्माने या प्रकरणावर आपले मौन तोडले आहे.
टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही दिवसांपूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. विश्वचषकापूर्वी बुमराह अनफिट असताना बराच गदारोळ झाला होता. आता बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची (Mohammed Shami) वर्ल्ड कप संघात निवड करण्यात आली आहे. मात्र काही क्रिकेट चाहत्यांना याचा फारसा आनंद झाला नाही. मात्र, आता संघाचा कर्णधार रोहित शर्माने या प्रकरणावर आपले मौन तोडले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने शनिवारी सांगितले की, टी-20 विश्वचषकात दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मैदानात उतरवणे संघाला परवडणारे नाही, तर त्याचा बदली खेळाडू मोहम्मद शमी कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरा होत आहे.
टी-20 विश्वचषकापूर्वी रोहितने कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत शमीच्या फिटनेसची माहिती दिली. जुलैपासून स्पर्धात्मक क्रिकेट न खेळलेल्या शमीचा संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित म्हणाला, “शमीला दोन-तीन आठवड्यांपूर्वी कोरोना झाला होता. त्यानंतर त्याला एनसीएमध्ये बोलवुन घेतले. गेल्या 10 दिवसात त्याने तिकडे खूप मेहनत केली आणि आता तो ब्रिस्बेनमध्ये आहे. तो उद्या आमच्यासोबत सराव करेल."
बुमराहबद्दलचे मौन तोडले
रोहित म्हणाला, “बुमराह एक उत्तम गोलंदाज आहे. आम्ही त्याच्या दुखापतीबद्दल अनेक तज्ञांशी बोललो पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. विश्वचषक महत्त्वाचा असला तरी त्यापेक्षा त्याची कारकीर्द महत्त्वाची आहे. तो फक्त 27-28 वर्षांचा आहे." रोहित म्हणाला, “त्याला इथे खेळवून धोका पत्करू शकत नाही. आम्ही त्याला मिस करू." तो म्हणाला, "दुखापत होणे दुर्दैवी आहे पण ते पुढे जात आहे. यामुळेच गेल्या वर्षभरात आम्ही खेळाडूंचा मोठा पूल तयार केला आहे. इतके सामने खेळून दुखापती होणारच. गेल्या एका वर्षात आमचे लक्ष बेंच स्ट्रेंथवर होते. "त्याबद्दल निराश होण्याने काहीही होणार नाही, काय करावे हे महत्वाचे आहे. म्हणूनच आम्ही इथे लवकर आलो आणि दोन सराव सामने खेळलो, अजून दोन खेळायचे आहेत.” (हे देखील वाचा: Women's Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेत श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा निर्णय चुकला, भारताने पुरेपूर फायदा उठवला)
रोहितला सूर्यकुमार यादवकडून आहेत आशा
गेल्या वर्षभरात भारताचा नंबर वन टी-20 फलंदाज असलेल्या सूर्यकुमार यादवकडूनही भारतीय कर्णधाराला खूप आशा आहेत. रोहित म्हणाला, “तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि आशा आहे की तो मधल्या फळीत असाच खेळत राहील. तो एक आत्मविश्वासू, निर्भय खेळाडू आहे आणि त्याच्या कौशल्यांचा चांगला वापर करतो.” भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी येथे पाकिस्तानशी खेळणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2022 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

