IND vs SA 1st T20I: भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचे संकट? जाणून घ्या कसे असेल हवामान
Thiruvananthapuram Stadium (Photo Credit - Twitter)

ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका (IND vs SA) खेळणार आहे. ही मालिका आजपासून म्हणजेच 28 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला T20 सामना केरळची राजधानी तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान, तिरुअनंतपुरममध्ये हवामान कसे असेल ते जाणून घ्या. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात तिरुअनंतपुरम येथे आमनेसामने येणार आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार असून, त्यासाठी खेळाडू केरळला पोहोचले आहेत. टी-20 विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने नुकतेच यजमानपदाच्या T20I मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला.

पावसाची शक्यता?

राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या काळात केरळमध्येही पाऊस झाला. बुधवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून सामना सुरू होईल. या कालावधीत पावसाची शक्यता 15-18 टक्के आहे. Weather.com च्या मते, ढगाळ वातावरण असेल. सामन्यादरम्यान कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता सुमारे 80 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. वाऱ्याचा वेग ताशी 32 किमी पर्यंत असू शकतो. (हे देखील वाचा: IND vs SA T20 2022: आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे येईल पाहता?)

तिरुवनंतपुरममध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड आहे चांगला 

केरळमधील या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत केवळ तीन सामने खेळले असून त्यापैकी दोन टी-20 सामन्यांचा समावेश आहे. त्यापैकी एका सामन्यात त्यांना विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आतापर्यंत भारताने या मैदानावर एकच एकदिवसीय सामना खेळला असून त्यात विजय मिळवला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्यांदाच या मैदानावर सामना होणार आहे.