Asia Cup 2025 Super 4 Points Table: पाकिस्तानच्या विजयाने सुपर-४ चे समीकरण गुंतागुंतीचे; अंतिम सामन्यासाठी आता कोणत्या संघांना संधी?
आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील पाकिस्तानच्या विजयानंतर फायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण रंजक बनले आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या चारही संघांची अंतिम फेरीसाठीची समीकरणे जाणून घ्या.
Asia Cup 2025 Super 4:आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ५ विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे पाकिस्तानने स्पर्धेतून बाहेर पडण्यापासून स्वतःला वाचवले आहे. या विजयासह पाकिस्तानचा संघ आता सुपर-४ पॉइंट टेबलमध्ये भारताच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे स्पर्धेतील समीकरण आता अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. पहिल्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानने श्रीलंकेला हरवून जोरदार पुनरागमन केले आहे. IND vs BAN: तिलक वर्माला शिखर धवनचा विक्रम मोडण्याची संधी; बांगलादेशविरुद्ध फक्त ३ षटकार मारताच रचणार इतिहास
Pakistan prevail in a closely-contested game! ✌️
Having lost their way briefly in the middle overs, 🇵🇰 did incredibly well to keep a calm head and chase down the target & get a W against their name. 😎#PAKvSL #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/hWFvjlMMoc
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 23, 2025
आता जर पाकिस्तानने आपला शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध जिंकला, तर त्यांचा अंतिम सामन्याचा मार्ग सोपा होईल. त्याचवेळी, श्रीलंकेला आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताने आपले सर्व सामने हरावे आणि बांगलादेशने पाकिस्तानला हरवावे, अशी प्रार्थना करावी लागेल, ज्यामुळे त्यांचे अंतिम सामन्यात जाण्याचे थोडेफार चान्स असतील.
कोणत्या संघाला फायनलमध्ये पोहोचण्याची संधी?
- भारत (India): भारताने पाकिस्तानला हरवून सुपर-४ मध्ये चांगली सुरुवात केली आहे. भारताचा नेट रन रेट (NRR) सध्या +०.६८९ आहे. भारताला आता बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याशी दोन सामने खेळायचे आहेत. जर भारताने यापैकी एक जरी सामना जिंकला, तरी त्यांचे अंतिम फेरीत पोहोचणे जवळपास निश्चित होईल.
- बांगलादेश (Bangladesh): बांगलादेशने श्रीलंकेला हरवून मोठा उलटफेर केला आहे. त्यांचा नेट रन रेट +०.१२१ आहे. बांगलादेशला आता भारत आणि पाकिस्तानशी दोन सामने खेळायचे आहेत. जर त्यांनी पाकिस्तानला हरवले आणि भारताने श्रीलंकेला हरवले, तर बांगलादेश अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे त्यांच्याकडे एक चांगली संधी आहे.
- पाकिस्तान (Pakistan): पाकिस्तानच्या विजयानंतर त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे चान्स वाढले आहेत. त्यांना आता बांगलादेशला हरवावे लागेल आणि भारताने बांगलादेशला हरवावे लागेल.
- श्रीलंका (Sri Lanka): श्रीलंकेसाठी अंतिम फेरीचा प्रवास खूपच खडतर बनला आहे. आता त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
अंतिम संघाची निवड कशी होईल?
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचे नियम सोपे आहेत. सुपर-४ च्या अखेरीस, पॉइंट टेबलमध्ये जे दोन संघ अव्वल असतील, ते अंतिम सामना खेळतील. ज्या संघांचे विजयाचे आणि गुणांचे आकडे जास्त असतील, ते अव्वल स्थानी राहतील. जर दोन किंवा अधिक संघांचे गुण आणि विजय सारखे असतील, तर ज्या संघाचा नेट रन रेट (NRR) चांगला असेल, तो संघ पुढे जाईल.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

