भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी सहा विकेट गमावल्यानंतर भारताने 493 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत उमेश यादव 25 आणि रवींद्र जडेजा 60 धावा करत खेळत आहेत. भारताने बांग्लादेशविरुद्ध 343 धावांची आघाडी मिळविली आहे.

ज्याकारणासाठी त्याला पाठविण्यात आले होते त्याच पद्धतीने उमेश यादवने फलंदाजी सुरू केली आहे. त्याने एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आठ चेंडूंमध्ये 24 धावा केल्या आहेत. यापूर्वी इबादत हुसेनने बांग्लादेशला सहावे यश मिळवून दिले. त्याने षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने रिद्धिमान साहाला बाद केले जो 11 चेंडूत 12 धावा करून परतला.

मेहदी हसनच्या ओव्हरमध्ये एक षटकात मारल्यानंतर ओव्हरच्या दुसर्‍या बॉलवर मयंक अग्रवाल अबू जाएदच्या हाती झेलबाद झाला. यासह मयंकचा डाव 243 धावांवर संपुष्टात आला. त्याने 330 चेंडूंमध्ये 28 चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 243 धावा केल्या. भारताकडे पहिल्या डावात 282 धावांची आघाडी आहे. 

मयंक अग्रवालने षटकार मारत दुहेरी शतक पूर्ण केले. मयंकने वीरेंद्र सेहवागच्या शैलीमध्ये 303 चेंडूत षटकारासह दुसरे द्विशतक पूर्ण केले. भारताकडे आता 209 धावांची आघाडी आहे. 

भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल त्याच्या दुसऱ्या दुहेरी शतकाच्या जवळ पोहोचला आहे. 96 व्या षटकानंतर मयंक 187 धावा करुन खेळत आहे. भारताने 199 धावांची आघाडी मिळविली आहे. 

टी ब्रेकनंतरचा खेळ सुरु झाला आहे. आणि ब्रेकनंतरच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर भारताला चौथा धक्का बसला कर्णधार अजिंक्य रहाणे अबू जायदच्या दुसऱ्या चेंडूवर कॅच आऊट झाला. रहाणेने 86 धावा केल्या. रहाणे आणि मयंक अग्रवालमध्ये 190 धावांची भागीदारी झाली होती. 

दुसर्‍या दिवशीच्या टी-ब्रेकपर्यंत भारताने 84 षटकांत 3 गडी गमावून 303 धावा केल्या आहेत. मयंक अग्रवाल टेस्टमधील दुसऱ्या टेस्ट शतकाच्या जवळ पोहचला आहे, तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे शतकाच्या उंबरठ्यावर आहे.  सुरुवातीला दोन झटके लागल्यावर मयंक आणि रहाणेने संघाचा डाव सर्वाला आणि शतकी भागीदारी करत भारताला बांग्लादेशविरुद्ध 153 धावांची आघाडी मिळवून दिली. 

भारताच्या 300 धावा पूर्ण झाल्या आहेत. मयंक अग्रवाल नाबाद 156 धावांवर खेळत आहे. आणि दुसऱ्या दुहेरी शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. दुसरीकडे, अजिंक्य रहाणेदेखील आपले शतक पूर्तीच्या अगदी जवळ आहे. सध्या रहाणे नाबाद 82 धावांवर मयंकला चांगली साथ देत आहे.  82 ओव्हरनंतर भारताकडे आता 151 धावांची आघाडी आहे. 

मयंक अग्रवाल वेगवान फलंदाजी करत आहे. तैजुल इस्लामच्या षटकात षटकार मारल्यानंतर त्याने पुढच्या षटकात पुन्हा चौथ्या चेंडूवर चौकार लगावला. रहाणे आणि मयंक यांनी 150 धावांची भागीदारी केली. तैजुल इस्लामच्या षटकात दोन चौकार ठोकत मयंक अग्रवालने आपलय 150 धावा पूर्ण केल्या. मयंकने 237 चेंडूत 151 धावा केल्या. त्यानेखेळीत 21 चौकार आणि तीन षटकार लगावले आहेत.

मयंक अग्रवालने तैजुल इस्लामच्या चेंडूवर चौकार मारला आणि भारताची धावसंख्या 250 पर्यंत पोहोचली. यासह भारताला 100 धावांची आघाडी मिळाली आहे. रहाणे आणि मयंक यांच्या मजबूत भागीदारीने टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असेल, जेणेकरून त्याच्याकडे फॉलोऑनचा पर्यायही उपलब्ध आहे.

Load More

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात इंदोरमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एक विकेट गमावत 86 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडिया बांग्लादेशच्या सध्या 64 धावा मागे आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद 43 तर मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) नाबाद 37 धावांवर खेळत आहेत. यापूर्वी बांग्लादेश संघ पहिल्या डावात 58.3 ओव्हरमध्ये 150 धावांवर ऑल आऊट झाला. यापूर्वी बांग्लादेशने भारताविरुद्ध पहिल्या सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताचा वरचष्मा आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 1 विकेट गमावली होती. आणि आता दुसऱ्या दिवशी संघ मोठा स्कोर करण्याच्या निर्धारित असेल. दुसरीकडे, बांग्लादेशी गोलंदाज भारताला मोठा स्कोर करण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात असतील.  बांग्लादेशला 150 धावांवर ऑल-आऊट केल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मयंकने भारताच्या डावाची सुरुवात केली. दोघांमध्ये 14 धावांची भागीदारी झाली असताना रोहित 6 धावांवर बाद झाला.

रोहित बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयंकने दुसर्‍या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली आणि दिवसाखेरीस संघाला अजून कोणताही झटका लागू दिला नाही. मयंक मात्र नशीबवान होता आणि 31 धावांवर त्याला जीवदान मिळाले. इमरूल कयास याने अबू जयाद याच्या चेंडूवर पहिल्या स्लिपवर मयंकचा कॅच सोडला. यानंतर दोन्ही फलंदाजांनी तिसर्‍या सत्रातील खेळ खेळून काही धावा जोडल्या. बांग्लादेशसाठी मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याने सर्वाधिक 43 धावा केल्या. शिवाय कर्णधार मोमीनुल हक याने 37, लिटन दास 21 आणि मोहम्मद मिथुन याने 13 धावांचे योगदान दिले. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्याच्याशिवाय इशांत शर्मा, उमेश यादव आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अश्विनने यासह टेस्ट क्रिकेटमधील घरच्या मैदानावर खेळताना 250 बळी पूर्ण केले आहेत. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या घरच्या मैदानावर खेळताना सर्वात जलद 250 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने मुरलीधरनची बरोबरी करत 42 सामन्यात हा पराक्रम केला आहे. अश्विनने या प्रकरणात भारताचा माजी कर्णधार आणि महान फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) याला मागे टाकले आहे. कुंबळेने घरच्या मैदानावर43 टेस्ट सामन्यात ही कामगिरी बजावली होती.