Virat Kohli Test Captaincy Successor: नवीन टेस्ट कर्णधारासाठी सुनील गावस्करांनी सुचवले Rishabh Pant चे नाव, ‘या’ महान भारतीय खेळाडूचे उदाहरण दिले
महान फलंदाजांपैकी एक माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मा किंवा केएल राहुलऐवजी दुसऱ्या खेळाडूला भारताचा पुढील कसोटी कर्णधार बनवण्याचा सल्ला दिला आहे. गावस्कर म्हणाले की, रिषभ पंतमध्ये उत्साह वाढवण्याची आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची क्षमता आहे. पंतने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सची कमान हाती घेतली आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी कर्णधार पदावरून अचानक पायउतार होण्याचा निर्णयानंतर युवा फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी आदर्श उमेदवार ठरू शकतो, असे मत भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी व्यक्त केले. 15 जानेवारी रोजी कसोटीतील वरिष्ठ राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद सोडण्याचा अनपेक्षित निर्णय घेऊन कोहलीने क्रिकेटरसिकांना चकित केले. खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये निवडकर्त्यांची पहिली पसंती असल्याने ते पंतला प्राधान्य देतील असे गावस्कर म्हणाले. गावसकर यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, “जोपर्यंत निवड समितीचा संबंध आहे, भारतीय क्रिकेटला (Indian Cricket) कोण पुढे नेणार याविषयी बरीच चर्चा होणार आहे. प्रथम, तो असा खेळाडू असावा जो खेळाच्या सर्व फॉरमॅटसाठी आपोआप निवडला गेला पाहिजे. एकदा असे झाले की ते अगदी सोपे होईल.” (Virat Kohli Leaves Test Captaincy: विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माने नव्हे तर 'या' दोन खेळाडूंपैकी एका खेळाडूवर BCCI टाकू शकते जबाबदारी)
मन्सूर अली खान पतौडी यांनी अगदी लहान वयात भारताचे नेतृत्वपद सांभाळले आणि अतुलनीय यश मिळवले या यशावर प्रकाश टाकून, 24 वर्षीय रिषभ पंत कसोटी कर्णधार म्हणून ज्या प्रकारे जबाबदारी पार पाडू शकतो ते पाहून गावसकर म्हणाले. पंतने कधीही वरिष्ठ राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले नाही परंतु गावस्कर यांना विश्वास आहे की तो तिन्ही फॉरमॅटमध्ये एक स्वयंचलित निवड आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा भार पंतसारखा युवा का हाताळू शकतो हे गावस्कर यांनी स्पष्ट केले. “होय, मी तेच म्हणतोय. टायगर पतौडी वयाच्या 21 व्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीत कर्णधार होता जेव्हा नारी कॉन्ट्रॅक्टर जखमी होते. त्यानंतर त्यांनी काय केले ते पाहा. त्यांनी पाण्यावर बदकाप्रमाणे कर्णधारपद स्वीकारले. मला वाटते की आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून रिषभ पंतला आम्ही जे पाहिले आहे, मला विश्वास आहे की त्याच्याकडे भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची आणि पाहण्यासाठी एक अतिशय रोमांचक संघ बनवण्याची क्षमता आहे,” गावस्कर म्हणाले.
विराट कोहलीने 2014-15 मध्ये कसोटी मालिकेदरम्यान एमएस धोनीकडून खेळाच्या सर्वात प्रदीर्घ फॉर्मेटमधून निवृत्ती भारताच्या कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. कोहलीच्या नेतृत्वात भारताला नंबर 1 कसोटी संघ बनला आणि 2021 मधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या उद्घाटन आवृत्तीच्या अंतिम फेरी गाठली. कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून 8 वर्षांचा कार्यकाळ संपवला ज्या दरम्यान तो खेळाच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून उदयास आला. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) मायदेशात कधीही कसोटी मालिका गमावली नाही आणि ऑस्ट्रेलियात पहिली-वहिली कसोटी मालिका जिंकली.
(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2022 10:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

